महाराष्ट्र 9

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल विभागाची कारवाई… १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड…

[espro-slider id=13780]

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल विभागाची कारवाई… १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड…


महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्कचोपडा प्रतिनिधी :–


चोपडा तालुक्यांतील गोरगावले खुर्द ते गोरगावले बु!! दरम्यान पुलावर दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकास मिळाली होती. त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या पथकाने सदर कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालयाच्या आवारात जप्त केली आहेत.


सविस्तर वृत्त असे की, तालुक्यांतील गोरगावले खुर्द ते गोरगावले बु!! दरम्यान पुलावर दोन ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाच्या पथकास मिळाली होती त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या पथकाने त्यात तलाठी गजानन पाटील , हिंगे आप्पा , सय्यद भाऊसाहेब , कल्पेश कुवर , मुकेश देसले यांसह इतर तलाठी व कर्मचारी आदींनी सापळा रचून दोन्ही ट्रॅक्टर अडविले असता अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक – मालक व महसुल कर्मचाऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात वाद झाल्याचे बोलले जात आहे. सदर वाद विकोपाला गेल्याने स्वरक्षणासाठी तालुक्यांचे तहसिलदार व पोलिसांना बोलाविण्यात आले. तालुक्याचे तहसिलदार अनिल गावित व पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सदर दोन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली.


सदर घटनेला आज जवळपास ८ ते १० दिवस झाले आहेत तरी सदर घटनेबद्दल महसूल विभाग स्पष्टपणे बोलण्यास का धजावत नाही हा एक यक्ष प्रश्न आहे.
काल सदर घटनेबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तालुक्याचे तहसिलदार अनिल गावित यांनी अजून दोन दिवस थांबा असे सांगून अधिक बोलणे टाळले. गोरगावले बु!! येथील तलाठी विजय पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सदर दिवशी मी रजेवर असल्याचे कारण सांगून हात झटकले.


तहसिल कार्यालयातील लिपिक किरण साळुंखे यांना अधिक माहिती विचारली असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ बी जी ९३३७ व दुसरे ट्रॅक्टरचे अजून पासिंग झाले नाही हे दोन्ही ट्रॅक्टर रामचंद्र मुरलीधर कोळी यांचे असून त्यांच्या दोन्ही ट्रॅक्टरवर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी १ लाख १० हजार रुपये दंड व महसूल विभागाने २५१७२ रुपयांचा दंड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड केला असल्याचे सांगितले. चोपडा तालुक्यात दिवसा ढवळ्या अवैधरित्या वाळू वाहतूक नेहमीच होतांना सामान्य नागरिक पाहत असतात मात्र महसूल विभाग नाम मात्र कारवाई करून कारवाई केल्याचा नुसता आव आणतात अशी शहरात सर्वत्र चर्चा आहे.


अवैध वाळू वाहतूक महसूल विभागाने कायमची बंद करून निसर्गाची हानी थांबविण्यात मोलाची भूमिका बजवावी असे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे…..

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]