महाराष्ट्र 9

शेतकऱ्यांच्या संघटना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत..एस बी पाटील

[espro-slider id=13780]

शेतकऱ्यांच्या संघटना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत….एस बी पाटील

चोपडा प्रतिनिधी आज देशात सर्वपक्षीय सरकार सत्तेत येते की काय झाले व काल पर्यन्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घसा कोरडा पडे पर्यन्त भाषण देणारे नेते सरकारी पक्षात जमा होत आहेत व एका रात्रीत देशातील शेतकरी कोट्याधीश झाले की काय असा साऱ्यांना भ्रम झाला.राजकीय पटलांवर काहीही झाले तरी शेतकरी संघटनांचे  जागल्याचे काम साऱ्या संघटना करीतच राहणार.त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. गेल्या पाच वर्षातील राज्यभर दुष्काळ व यावर्षी  काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टीमुळे पूर यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी देखील आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागणार आहे यात शँका नाही.
येणाऱ्या निवडणुकांच्या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना पुन्हा एकदा काहीतरी कुल्फी दिली जाईल व  ते देखील त्याला बळी पडू शकतात .त्या सुज्ञाना विनंती आहे की विचार करा ,गेल्या काही वर्षात कोणत्याही विभागात नोकर भरती झालेल्या नाहीत,मेगा भरती खोटया आहेत .मंदीने काहींच्या नोकऱ्या गेल्यात तर काही कमी पगारा वर काम करीत आहेत,कलम ३७०हटवल्याने काही काश्मिरात व्यवसायाला गेले असतील पण ते आम्हाला माहित नाही, पक्षांतर केल्याने फक्त पुढाऱ्याच्या मुलांचे पुनर्वसन झाल असल्याचे ऐकीवात आहे.
    तुम्हाला तुमचे भविष्य घडवायचे असल्यास शेती एके शेती व शेती दुणे शेती हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे.त्यासाठी शेतीतील धोके टाळण्यासाठी नैसर्गिक तोटे झाल्यास कायदेशीर(फसवा नाही) पीकविमा मिळावा यासाठी अस्तित्वातील कायद्यातील त्रुटी दूर होणे साठी लढा द्या,दुष्काळ अथवा इतर अपघात झाल्यास(जसा आता पूर आला) तात्काळ मदत मिळणेसाठीची राष्ट्रीय आपद्ग्रस्त  योजना(Disaster management system) सक्षम व्हावी,बाजारपेठेत भाव पडल्यास खरी किमान आधारभूत किंमत(सध्याची लबाड सिस्टीम नाही) मिळणेसाठी भावांतर योजना राबवावी.
हे सारे झाल्यास तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.यासाठी तुमच्या भागातील योग्य शेतकरी प्रतिनिधी निवडा.
    शेतकरी संघटना ह्या तुमच्या सोबत आहे असे शेतकरी कृती समिती सदस्य एस.बी पाटील यांनी सांगितले

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]