महाराष्ट्र 9

नवापूर विधानसभा आप तर्फे डॉ. सुनिल गावित निवडणूक लढवणार….

[espro-slider id=13780]

नवापूर विधानसभा आप तर्फे डॉ. सुनिल गावित निवडणूक लढवणार….

नवापूर  विधानसभेत वर्षानुवर्षे घराणेशाही पद्धतीने उमेदवार दिले जातात.सामान्य जनतेचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जनतेप्रमाणे सरकारदरबारी डॉ सुनील गावीत यांना अनेक अडचणी येत गेल्या. त्या अडचणी इतरांना येऊ नये यासाठी निवडणुकीच राजकारण गरजेचे बनलेल आहे, असे मत माझ्या मित्र परिवार, हितचिंतक, समर्थक यांच्यासहित सर्वांचे झाल्याने नवापूर विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षातर्फे डॉ सुनील गावित यांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने सर्वांशी हितगुज साधण्यासाठी त्यांनी सर्वांना आमंत्रित केले होते. त्यात आम आदमी पक्षाकडून  राज्य प्रचार समितीच्या वतीने मुंबईहुन जळगाव येथील रहिवासी  युवानेते रईस खान यांना निरीक्षक म्हणून पाठवले  होते. आजची मिटिंग महात्मा गांधी वाचनालय येथे पार पडली.
     
डॉ. सुनिल गावित यांची भूमिका :-  सर्वसामान्य जनतेला अजूनही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. जसे आरोग्य, पाणी, वीज, रस्ते, सरकारी शाळा जसेच्या तसेच आहेत. जनतेला सामान्य हक्कासाठी लढा द्यावा लागत आहे. शेतकरी हवाल दिल झालेला आहे. तरुण बेरोजगार आहे. जस दिल्ली सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी जी कामे केलेली आहे, ती महाराष्ट्रात ही व आपल्या क्षेत्रात ही तशी कामे करून दाखवेल. जसे मोहल्ला क्लिनिक आहे तसे खेड्यापाड्यात सरकारी दवाखाने सर्व सुविधा पूर्ण, मुलांना उत्तम शिक्षण, कमीत कमी वीज बिल, मोफत पाणी, आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम होस्टेल, शेतकरी वर्गासाठी स्वामिनाथन आयोग लागू करणे, यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील.

रईस खान यांची पक्षातर्फे भूमिका :- आजच्या या हितचिंतक मेळाव्यात डॉ. सुनिल गावित यांनी आपली निवडणूक लढविण्याची भूमिका स्पष्ट केली. त्याला  आलेले राजेश दामा गावित, इम्तियाज भाई खाटीक, दाविद गावित, सिंगा दादा विसावे, अरविंद पाडवी व सर्व जमलेले हितचिंतक व जेष्ठ नागरिक व मित्र परिवाराने दुजोरा देतांना  त्यांच्यासाठी तन मन धनाने डॉ. सुनिल गावितयांच्या बरोबर राहण्याचे अभिवचन दिले. या सर्व अभिवचनाला टाळ्यांच्या कडकडकात जनतेनी प्रतिसाद दिला. डॉ. गावित यांचे निवडणूक जिंकण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अविरल प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. आजच्या या मीटिंगचा अहवाल मी महाराष्ट्र राज्य प्रचार समितीकडे पाठवले, व राज्य निवड समिती मुंबई येथे डॉ. गावित यांची मुलाखत घेऊन त्यांनतर दिल्लीहून अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व  उमेदवारांची येत्या दहा दिवसात नावे जाहीर करण्यात येतील. अजूनही काही इच्छुकांना निवडणूक लढण्याची तयारी असेल तर त्यांनी मुंबई येथे पक्षाच्या मुख्यालयात संपर्क करावा.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]