भावी पिढी व्यसनमुक्त रहावी यासाठी तंबाखू मुक्त शाळा अभियान काळाची गरज!
जळगाव जिल्हा लवकरच जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळांचा जिल्हा होणार-
तंबाखू नियंत्रण अभियान जिल्हा ब्रॅण्ड एम्बेसेडर राज मोहम्मद खान शिकलगर यांचे प्रतिपादन!
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा (प्रतिनिधी):-
शिक्षणविभाग, आरोग्यविभाग, सलाम मुंबई फौंडेशन च्या या अभियानास जिल्ह्यातुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
व्यसन एक अशी सवय आहे एकदा लागली तर सोडायला फार त्रास होतो. खरं बघितले तर तंबाखू, गुटखा, धूम्रपान, याचे व्यसन एकदा लागले तर लवकर सुटत नाही.
व्यसनाधीन लोकांना याचे दुष्परिणाम सविस्तर पणे समजावून सांगूनही काही बहाणा करून वेळ मारून नेतात. कॅन्सर सारख्या जीवघेणा आजारा विषयी माहिती असूनही काही ही उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही.
आज भारतात दररोज 3500 लोक कॅन्सर सारख्या आजाराने मृत्यूमुखी पडत आहेत. दर वर्षी 13 लाखाहून अधिक लोक असंसर्गजन्य रोगांमुळे जीव गमावत आहेत. लाखो लोकांची कॅन्सर रुग्ण म्हणून भर पडतेय पण या कडे व्यसनाधीन लोक डोळेझाक करत आहेत.
आज ची परिस्थिती अशी आहे तर भविष्यात काय होणार याची जाणीव व भविष्यातला होणारा कॅन्सर आणि असंसर्गजन्य रोगांचा धोका टाळण्यासाठी तंबाखू मुक्त शाळा अभियान याची गरज आहे.

भविष्यात या संकटातून सावरण्यासाठी आपल्याला आपल्या भावी पिढी वर लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून तंबाखू मुक्त शाळा अभियान द्वारे विद्यार्थ्यांना तंबाखू चे दुष्परिणाम माहिती होणे व या व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व समजणे आवश्यक आहे.

या साठी आरोग्य विभाग मार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत व शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य ,सलाम मुंबई फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात ये असलेले तंबाखू मुक्त शाळा अभियान ही काळाची गरज बनली आहे.प्रत्येक जिल्ह्यात युद्धपातळीवर हे अभियान राबविले जात आहे.

या कामी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मार्गदर्शनात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्षानाखाली सलाम मुंबई फौंडेशन च्या या अभियानाला सर्व शिक्षण विभाग व जिल्ह्यातील सहयोगी संस्था जन मानवता बहुउद्देशीय संस्था ची साथ मिळत आहे.

या अभियानात जळगाव जिल्हा लवकरच तंबाखू मुक्त शाळांचा जिल्हा घोषित होईल. तत्कालीन जिल्हाधिकारी मा अभिजित राऊत साहेबांचे मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा डॉ पंकज आशिया साहेब यांचे निर्देशानुसार जिल्ह्याने तंबाखू मुक्त शाळा अभियानात भरारी घेतली. नूतन जिल्हाधिकारी मा अमन मित्तल साहेब व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया साहेब यांचे ही मार्गदर्शन या अभियानास मिळत असून जिल्ह्यातील 3328 शाळा पैकी 3000 शाळा तंबाखू मुक्त घोषित झाल्या आहेत.
भडगाव, भुसावळ, बोडवड, जळगाव ग्रामीण, मुक्ताईनगर, पारोळा आणि यावल तालुक्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.
उर्वरित तालुक्यातील शाळा लवकरच होतील तंबाखू मुक्त होण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण साहेब , प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री बच्छाव साहेब, विजय पवार साहेब, सलाम मुंबई फौंडेशन चे संजय ठाणगे साहेब, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ संपदा गोसावी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष सल्लागार डॉ नितीन भारती, राहुल बऱ्हाटे, निशा कटरे , रुचिका साळुंखे, सर्व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी साहेब, केंद्र प्रमुख,सर्व मुख्याध्यापक, तालुका समन्वयक शिक्षक, जिल्ह्यातील पत्रकार बांधव यांचे विशेष सहकार्य या अभियानात मिळत आहेत.
या मुळे आपला जळगाव जिल्हा जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहेत असे प्रतिपादन जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळा अभियानाचे मार्गदर्शक व जिल्हा ब्रॅण्ड एम्बेसेडर तंबाखू मुक्त अभियान राज मोहम्मद खान शिकलगर यांनी केले आहे.