महाराष्ट्र 9

अडावद येथे ३६ कोटींच्या पाणी योजनेचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील ( पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ) यांच्या हस्ते संपन्न…

[espro-slider id=13780]

अडावद येथे ३६ कोटींच्या पाणी योजनेचे भूमिपूजन ना. गुलाबराव पाटील ( पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ) यांच्या हस्ते संपन्न…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपड़ा । प्रतिनिधी


अडावदकरांसाठी बहुप्रतिक्षीत असलेली पाणी पुरवठा योजना अखेर तालुक्याच्या आमदार सौ. लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या सततचा पाठपुरावा आणि प्रयत्नाने तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने ३६ कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन प्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, चोपडा मतदार संघाशी माझी कायमची मैत्री आहे. अडावद गावात मी पाच वर्षे शिक्षणासाठी राहिलो आहे .


चोपडा तालुक्यात राष्ट्रवादीचे आतापर्यंत तीन आमदार झालेत. त्यात प्रा. अरुण गुजराथी , जगदीश वळवी, प्रा. दिलीपराव सोनवणे पण त्यांनी विकास कुठेच केला नाही…
आज सकाळी दापोरा गावी १६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना व आज सायंकाळी ३६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे एकूण दिवसभरात ५१ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करणारा मी महाराष्ट्र राज्यात पहिला मंत्री असेल असं त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.
महाराष्ट्रात ३२००० गावांना पाणी द्यायचे आहे पैकी १८००० गावांमध्ये पाण्याच्या योजना प्रत्यक्षात सुरू झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
गुवाहाटीला मी ३३ व्या क्रमांकाला गेलो. ३८ आमदार संख्या झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असती .आम्ही मंत्रीपदाचा राजीनामा देऊन, भविष्याच्या विचार न करता एकनाथ शिंदे साहेबांना साथ दिली असल्याचं म्हटले आहे
१७५ कोटींचा जळगाव चोपडा रस्ता तसेच १७२ कोटींचा तापी नदीवरील पूल तसेच ३५० कोटी रुपये विम्याचे मिळवून देणारा मी आहे व सातत्याने गोरगरिबांसाठी रात्रंदिवस, अहोरात्र काम करणारे आम्ही आमदार आहोत असे ते आपल्या मनोगतात म्हणाले…


*आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो’, बंडखोरीबद्दल गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा..*
महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन महिन्यांपूर्वी फार मोठा भूकंप आला होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष अशी ख्याती असलेल्या शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेना पक्षातील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली . त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी १० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे तब्बल ५० आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या बंडखोरीबद्दल शिंदे गटाचे
नेते आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचं म्हणतात. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आतादेखील महत्त्वाचं विधान केलंय. आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही ८ जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची ३८ संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती, अस विधान केलंय..


उठावासाठी ३८ आमदार लागणार होते. मी ३३ वा होतो, ५ आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे सचिव, खासदार संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं, असं देखील गुलाबराव म्हणाले. असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो, असं देखील विधान त्यांनी केलंय…


*तालुक्याला राजकारणा पेक्षा विकासाची गरज …. माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे..*
मागील ८ वर्षांपासून चोपडा तालुक्यात मी व्यक्तिगत राजकारण न करता विकासाचे राजकारण करत आहे. कोट्यावधींची कामे होत आहेत. धानोरा येथे १६ कोटी , अडावद येथे ३६ कोटी व लासूर येथे ६५ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे त्यासाठी २७ कोटींच्या बंधाऱ्यांचे नियोजन केले असल्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी २४ तास वीज मिळावी म्हणून अनेक ठिकाणी सबस्टेशनची व्यवस्थाही करीत असल्याचे सांगितले व तालुक्यात ३५ गावांमध्ये व्यायाम शाळा दिल्या असल्याचे प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]