शिवसेना नमली ही केवळ अफवा आहे. संजय राऊत

राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेत पन्नास टक्के वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरही दावा केला आहे. मात्र भाजपाला ते मान्य नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात मतभेद सुरु आहे . यावरून शिवसेना नरमली. राज्यासाठी युती आवश्यक आहे आणि समसमान वाटपासाठी शिवसेना आग्रही नाही या वृत्तावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले .
शिवसेना नमली, माघार घेतली, तडजोड केली, समसमान पदांची मागणी सोडली वगैर अशा पुड्या सुटू लागल्या आहेत. ये पब्लिक है, सब जानती है. जे ठरले होते त्या प्रमाणेच होईल, अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे .
महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवू. कुंडलीत कोणता ग्रह कुठे ठेवायचा आणि कुठले तारे जमिनीवप आणायचे. कुठल्या ताऱ्याला चमकवायचे, याया ताकद आजही शिवसेनेत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले





