साखर कारखान्याचे भंगार झाले गायब, दोन ते अडीच कोटी रुपयांचे होते भंगार : संचालकांचा पत्रकार परिषदेतून बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे व साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे यांच्यावर आरोप…
चोपडा प्रतिनिधि
चहार्डी तालुका चोपडा येथील सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याआधी त्या कारखान्यात जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे भंगार साहित्य होते, परंतु सर्व भंगार साहित्य हे गायब झाले असून, बारामती ॲग्रो ने सुरुवातीला वापरले. मात्र चेअरमन अतुल ठाकरे यांनी त्याबाबतचा हिशोब संचालक मंडळासमोर दिलेला नाही. तसेच वर्डी येथील स्टोअर मधील कर्मचारी शेखर पाटील गेल्या पंधरा वर्षापासून स्टोअर मध्ये कामाला होते.
कारखाना सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस त्यांनी काम केले, त्यांच्या हातून पन्नास लाखाचे साहित्य बारामती ऍग्रो ला पुरवले होते. ते कर्मचारी प्रामाणिक होते म्हणून त्यांना कामावरून कमी केले. त्या ठिकाणी अनुभव नसलेले कर्मचारी भरले गेले. जेणेकरून भंगार मध्ये भ्रष्टाचार करता येईल, असा कर्मचारी भरला गेला. म्हणून जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे भंगार लंपास करण्यात आलेले आहे.

त्यानंतर कारखान्यामध्ये मोलासिस च्या दोन टाक्यांमध्ये 1000 ते 1200 टन मोलासीस शिल्लक होते. त्याचा बाजारभाव अंदाजे पाच ते सहा हजार रुपये प्रति टन एवढा होता. त्याचाही हिशोब संचालक मंडळासमोर आलेला नाही. त्याची विल्हेवाट कशी व कुठे लागली? याबाबतही चौकशी होण्यासाठी तज्ञ संचालक विजय दत्तात्रय पाटील यांनी साखर साखर आयुक्तांकडे जवळपास 26 मुद्दे नोंदवून लेखी तक्रार केलेली आहे. तोच तक्रारी अर्ज जिल्हा निबंधक आणि तहसीलदार अनिल गावित यांच्याकडेही त्यांनी तक्रार म्हणून दिलेला आहे. कारखान्यांमध्ये अंदाधुंद कारभार चालतो. या नोंदवलेल्या सगळ्या मुद्द्यांची मुद्दे निहाय चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून श्री विजय दत्तात्रय पाटील यांनी केली आहे. कारखाना सुरू होण्या अगोदर त्यांनी शंभर टन भंगार, दोन ट्रक ट्रक भर रबरी टायर त्यामध्ये कारखान्याचे बैलगाडी तोडून भंगाराच्या विक्री करण्याची निविदा प्रक्रिया न करता विकले. रबराचे भाव कोरोना काळात जास्त असताना कमी भावात विक्री दाखवले, तसेच साखर कारखान्याचा पेट्रोल पंप टॅंक मध्ये अंदाजे पाच हजार लिटरच्या पेक्षा जास्त डिझेल शिल्लक होते. त्याचाही हिशोब नाही.

पेट्रोल पंप बारामती ॲग्रो ला देताना त्या डिझेलचे काय झाले?, ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांच्याकडे जवळपास साडेचार कोटीच्या वर रक्कम घेणे आहे त्यांचे दावे न्यायालयामध्ये सुरू आहेत व काही दाव्यांची तडजोड झाली आहे. तडजोडमार्फत किती पैसे कारखान्याकडे जमा झाले आहेत, त्याचा खर्च कसा केला याचा हिशोबही अजून दिलेला नाही. कारखाना बंद पडण्याच्या अगोदर शेतकऱ्यांकडेही ऊस बेणे पेमेंट अडीच ते तीन कोटी रुपये घेणे होते. यापैकी चेअरमन अतुल ठाकरे यांनी बऱ्यापैकी पैसे वसूल केले असून त्याचा हिशोब दिलेला नाही.बारामती अग्रोने भाडे तत्त्वावर कारखाना चालवण्यासाठी चोसाकाला देण्यात येणारे पैसे हे कुठल्याही प्रकारचे व्याज न लावता देण्याचे बारामती अग्रो व संचालक आणि चोपडा तालुक्यातील श्रेष्ठ यांच्या समोर हा विषय न होता. चेअरमन आणि प्रभारी एम डी यांनी करारा मध्ये परस्पर विषय घेतला की. जे बारामती अग्रोने चोसाकाला पैसे दिले आहेत त्याच्यावर 12% व्याजदर लागेल. यात बारामती अग्रोने व चेअरमन एम डी यांनी संचालक व सभासद यांची फसवणूक केलेली आहे याच्यात चेअरमन यांनी व एम डीने बारामती अग्रो कडून मोठी रक्कम घेतली असे वाटते याची सखोल चौकशी व्हावी. यासह इतर अनेक आर्थिक व्यवहार झालेले आहेत. याची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे .

एकूण 26 मुद्द्यांचा तक्रारी अर्ज जिल्हा निबंधक यांच्याकडे चौकशीसाठी देण्यात आलेला आहे. सदर तक्रार अर्जाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, पालकमंत्री गुलाबराव पाटील,मंत्री गिरीश महाजन, किरीट सोमय्या, सहकार आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त साखर विभाग औरंगाबाद, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडेही तक्रार अर्जाची प्रत देण्यात आलेली असल्याचे पत्रकार परिषदेतून विजय पाटील यांनी सांगितले.
