अमानवीय पद्धतीने गुरांची अवैध वाहतूक , ११ गुरे मृत्युमुखी , २४ गुरांची एकाच गाडीत वाहतूक..
चोपडा प्रतिनिधी :– तालुक्यांतील वेले गावाजवळील खाजगी आय टी आय जवळ आयशर गाडी क्र. एम पी ४१ जी ए २५५८ हया गाडीचा शिताफीने पाठलाग करत चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पो ना संतोष पारधी , विजय बछाव , दिपक विसावे , वेलचंद पवार , रवि पाटील (होमगार्ड पी ओ ) यांनी गाडी पकडण्याचा प्रयत्न केला असता गाडी चालक व क्लिनर दोन्हींनी चालत्या गाडीतून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार होण्यास यशस्वी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की, शहर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शिरपूर कडून गुरांचा भरलेला ट्रक येत आहे. त्या माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर गाडीवर पाळत ठेवली. हातेड येथे सदर गाडी पोलिसांच्या दृष्टीस पडली. सदर गाडीला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक शर्थीचे प्रयत्न केले परंतू गाडी चालक अतिशय वेगाने व बेभान पद्धतीने गुरांनी भरलेली गाडी चालवत, पोलिसांना चकमा देत वेले पर्यंत आला. सदर ठिकाणी गाडीला ओव्हरटेक करून चालकांना पकडण्याच्या आधीच चालक व क्लिनर दोन्हींनी गाडीतून उड्या मारत अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार होण्यास यशस्वी झाले. पोलिसांनी तब्बल २१ किलोमीटर पाठलाग करून गाडी पकडली.नंतर सदर गाडी शिरपूर रस्त्यावरील हॉटेल पांचाली जवळ आणून गो रक्षकांच्या मदतीने गाडीतील जनावरांची सुटका करण्यात आली. गाडीत सर्व जनावरे त्यात गायी , गोरे अक्षरशः दोन टप्प्यांत कोंबलेले होते. गाडीत जनावरे एकमेकांना अक्षरशः अमानवीय पद्धतीने बांधलेली होती. सदर जनावरांना खाली उतरवतांना मोठी दमछाक झाली. जनावरांना उभे सुध्दा राहता येत नव्हते. जनावरांना पाणी पाजून , इंजेक्शन देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. सदर गाडीत एकूण ३५ जनावरे होती पैकी ११ जनावरे दगावली आहेत. इतर उर्वरीत जनावरांवर डॉ पंकज सैदाने , संतोष कणके आदींनी उपचार केले.

गाडीतून जनावरे उतरविण्यासाठी गो रक्षक प्रविण जैन , प्रेम घोगरे , गजेंद्र जैस्वाल ,संग्राम परदेसी,लखन गुरव, गणेश धनगर , अजय भोई , सोनू धनगर , जिग्नेश कांखरे , गणेश चौधरी आदिंनी मेहनत घेऊन जनावरांचा जीव वाचविला…

*मुद्देमाल जप्त मात्र आरोपी फरार *
पोलिसांनी तब्बल २१ किलोमीटर पाठलाग करून गाडी पकडण्यात , मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस यंत्रणा यशस्वी झाली आहे मात्र गाडी चालक व क्लिनर दोन्हींही चालत्या गाडीतून फरार झालेच कसे असा प्रश्न चर्चिला जात आहे. तसेच सदर जनावरे कत्तलीसाठी नेमकी कुठे जात असावीत. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच गाडीत दोन टप्प्यांत ३५ जनावरे कोंबलीच कशी ? असे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चिले जात होते.
भाजपचे माजी नगरसेवक गजेंद्र जैस्वाल घटना स्थळी गोरक्षण कार्यकर्ते सोबत घटनास्थळी रात्री एक वाजे पर्यंत मृत जनावरे पुरण्यास पोलीस प्रशासनास मदत करत होते
