महाराष्ट्र 9

संरपच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांच महत्व काय#राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी उपस्थित केला प्रश्न?

[espro-slider id=13780]

संरपच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे महत्व काय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी उपस्थित केला प्रश्न?




चोपडा (प्रतिनिधी):- शासनाने पुन्हा जनतेतून संरपच निवड करण्याचा निर्णय घेतला. पण ग्रामपंचायत सदस्यांचे महत्व काय? असा प्रश्न जळगाव जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी उपस्थित केला.मागच्या कालखंडात सुद्धा भारतीय जनता पार्टीने थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी झालेला बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये सरपंच एका गटाचे आणि सदस्य एका गटाचे निवडुन आले. परिणामी दोन गटात सतत वादांमुळे तालुक्यातील अनेक गावांचा विकास खुंटला गेलेल्या दिसून येत आहे.

जनतेतून निवडून आल्याचा दिमाख करत अनेक सरपंचांची मनमानीपणे गावांचा कारभार करत कोणतीही निर्णय प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्यांच्या सल्ला ऐकत नाही व विश्वास घेत नाही. ग्रामसेवक हाताशी धरून विकास कामांच्या नावाखाली गुप्तता बाळगून मलाही खाण्याचे प्रकार आढळत आहे. ग्रामपंचायतचे अनेक निर्णय घेतांना सदस्यांना दूर ठेवले जाते. ग्रामपंचायत मध्ये सदस्य असल्याचे महत्वच उरत नाही. यामुळे निवडून आलेल्या सदस्यांच्या मनात नाराजी दिसुन येते आहे. याची दखल घेत महाविकास आघाडीने थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द केली होती. परंतु सरकार बदलताच शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा हा निर्णय घेतला. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या नाराजीच्या सुर निघत आहे.या सरकारला तर हाच निर्णय योग्य वाटत असेल तर मग ज्या प्रकारे नगरसेवकांना आपल्या प्रभागात विकास करण्यासाठी निधी मिळतो. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा आपल्या वार्डात निधीची तरतूदहि केली पाहिजे.


कारण एखाद्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच एका गटाचा आणि ग्राम सदस्य दुसऱ्या गटाचा असु शकतो. तर परिणामी त्या सदस्याचा दुजाभाव केला जातो. आणि त्या सदस्याच्या वार्डात विकास कामे होत नाही. अशी जर ग्रामपंचायत सदस्यांची कोंडी होत असेल. तर ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी निवडणूक कोण लढणार? ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येऊन उपयोग काय? असा प्रश्न निर्माण होतो. यामुळे या निर्णयाचा सरकारने पुन्हा परिपुर्ण विचार करून ग्रामपंचायत सदस्याच्या अधिकारात वाढ करून वार्ड वाईस निधी दिला पाहिजे. असे मत जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश लक्ष्मण साळुंखे रा. बुधगाव ता. चोपडा यांनी मांडले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]