भारतीय कम्युनिस्ट पार्टीतर्फे.
.पेट्रोल ,डिझेल, गॅस, तेल व औषधी दरवाढ विरुद्ध आंदोलन …
अशा अच्छे दिनां?”पेक्षा २०१४पू र्वीचे” बुरे दीन” द्या.. ! उपरोधक मागणी
चोपडा प्रतिनिधी :–

. केंद्र सरकार आपल्या अखत्यारीत असलेल्या पेट्रोल – डिझेलचे भाव दररोज वाढवत आहे. व जनतेला पिळून काढत आहे .त्याचप्रमाणे,गॅस, खाद्य तेल आदीचे दरही सतत वाढत आहेत. शेतकऱ्यांचे गरजेचे रासायनिक खते, बी – बियाणे, औषधी यांच्या दरवाढी सुरूच आहेत.तसेच सरकारी कार्यालयमध्ये कामाची कागदपत्रसाठी प्रतिज्ञापत्रे आदीची फी वाढतच आहे. दुसरीकडे शेतमजूर कष्टकरी यांचे मजुरी दरात वाढ नाही. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना राज्य व केंद्र सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे..

शेतमजुरां मध्ये बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीमालाचे भाव कमी कमी होत आहेत ,असंघटित कामगारांचा रोजगार कोविड 19 काळात कमी झाला आहे. छोटे व्यवसाय डबघाईला आले आहेत .आणि सरकार जनतेला दिलासा/ मदत देण्याऐवजी त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू, दर वाढवत आहे. मागील राजवटी पेक्षा भाजप सरकार जनतेला बुरे दिवस आणत आहे आणि 2014 लोकसभेच्या निवडणुकीत “अच्छे दिन” चे गाजर दाखवून या सरकारने सत्ता मिळवली पण आता जनतेचा विश्वासघात करीत आहे आणि या मूलभूत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे पांगवण्यासाठी राम मंदिर ,पाकिस्तान चीन, हिंदू-मुस्लीम मुद्दे पुढे करून जनतेमध्ये तेढ निर्माण करीत आहे. *आपण कबूल केलेले अच्छे दिन आज मितीस सर्व वस्तूंचे दर वाढवून मिश्किल अर्थाने बोलवायचे झाल्यास केंद्र सरकार काय असले “अच्छे दीन?” लादत असेल तर जनतेला हे नकोत व 2014 पूर्वीचे बुरे दिन द्यावेत अशी अपेक्षा*अशी उप्रोधक मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे चोपडा तहसील कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी लक्ष्मण शिंदे ,अमृत महाजन, शांताराम पाटील ,वासुदेव कोळी यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.त्यात म्हटले आहे की,. महागाईचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा लालबावटा शेतमजूर युनियन निषेध करत करून चार्टर ऑफ डिमांड शासनाला दिला
१) केंद्र सरकारने * एक देश एक टॅक्स आणून फार मोठा गाजावाजा केला प्रत्यक्षात पेट्रोल ,डिझेल, गॅस यांना बाजूला ठेवले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाची किंमत त्यावरील प्रक्रिया खर्च व त्यावर जीएसटी लावून पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ व अंकुश आणावा 2,)kovid19काळात शेतकरी, शेतमजूर ,व्यवसायिक यांच्या खात्यावर दरमहा साडेसात हजार रुपये टाकावेत रोजगार व्यापक सुलभ उपलब्ध करून द्यावा
३) शेतमजूर यांना भूमिहीन शेतमजूर, शेतकरी ,विधवा, घटस्फोटिता, दिव्यांग ,यांच्या योजना राबवताना लागणारी वयाची कागदपत्रे मेडिकल ऑफिसर यांचेकडून सरकारी रुग्णालयांकडून मिळवण्याची व्यवस्था करावी. या योजनांतर्गत मिळणारे मानधन पेन्शन दर महा .2000 ₹ करावे .थकीत मानधन अदा करा वृद्धांसाठी महिला ६० व पुरुष ६५ वर्षे अट करा
४)) किसान सन्मान योजनाचे मानधन दरमहा पाच हजार रुपये करावी केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा
५)सरकारी कार्यालयांमधून उत्पन्नाचा दाखला योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांची फी २०१४ सालच्या पातळीवर आणावी ६)शहरी व ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील लोकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा ड यादीतील लोकांना घरे बांधून ध्या
७)पंतप्रधान योजनेअंतर्गत ज्यांची घरकुले आपुरी पडली आहेत त्यांना अनुदानाची रक्कमा पूर्णपणे द्या
८)) मागेल त्याला रेशन कार्ड व रेशन कार्ड मधील दुरुस्त्या फाटकी कार्ड बदलणे याबाबतीत तातडीने कार्यवाही व्हावी तसेच बीपीएल व पी एल असा भेदभाव न करता सर्व रेशन कार्ड धारकांना दोन रुपये किलो प्रमाणे पन्नास किलो जीवनावश्यक वस्तू देण्यात येईल व्यवस्था करावी अन्नसुरक्षा योजनात समावेश करा ९)कोविड19 प्रतिबंधक लसी मोफत देण्यात याव्यात व लशिकरण मोहीम झपाट्याने राबविण्यात यावी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन आरोग्यासाठी च्या अंदाजपत्रकीय तरतूद वाढवण्यात येऊन औषध उपचार व इलाज मोफत करावे त
१०)आदिवासी करता खावटी देण्याची व्यवस्था व्हावी
११)जिल्हा परिषद व सर्व शाळा सुरू करा
१२). शेतकरी व कामगार विरोधी कायदे मागे घ्या….
आंदोलनात सोमा कुंभार ,छोटू पाटील, सुमनबाई चौधरी, मिराबाई सोनवणे ,रेखाबाई भालेराव ,रंगुबाई बारेला ,फुलाबाई बारेला , सुमन बाई माळी ,पुंजाबाई भिल , प्रमिलाबाई भिल , चंदा भिल आदी कार्यकर्ते सहभागी होते…

