मोहवृक्ष बंधनमुक्त व्हावा , शेतकऱ्यांचे नाना पटोलें यांना निवेदन—
चोपडा प्रतिनिधी :–

राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांना मोहवृक्ष राज्यात इतर वृक्षांप्रमाणे बंधंमुक्त व्हावा या आशयाचे निवेदन खानदेशातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतेच अमळनेर येथे दिले.

अंबिका मंगल कार्यालयात मोहवृक्ष संवर्धन मंडळाचे सदस्यांनी त्यांना हे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी इतर फळ झाडाप्रमाणे या वृक्षाच्या विस्तारीकरणासाठी हा वृक्ष वनौषधी म्हणून प्रसिद्ध आहे.

या वृक्षाच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर मोहाची रोपे कलमी स्वरूपात लागवडीसाठी आणणे गरजेचे असून त्या साठी शासकीय फलोत्पादन फळबाग लागवड योजना व आयुष मंत्रालयाच्या योजनाचा लाभ मोहवृक्ष लागवड शेतकऱ्यांना द्यावा आणि त्यावर प्रक्रिया उद्योगासाठी इतर राज्यांप्रमाणे बंधन मुक्त करणे गरजेचे असून इतर राज्यांच्या परवाना मुक्त धोरणा प्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुध्दा त्या वरील सर्व निर्बंध शेतकऱ्यांच्या हितासाठी हटवण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शासन स्तरावर या वृक्षाच्या विकासा साठी मोहवृक्ष विकास समिती नेमण्यात यावी असाही आग्रह यात करण्यात आला आहे. यावेळी मोहवृक्ष संवर्धन मंडळाचे सदस्य अभिजीत पाटील (जवखेडे) उद्यान पंडित पुरस्कृत शेतकरी अवधूत महाजन( चुंचाळे) नरेंद्र पाटील( हिंगोणे) राजेंद्र पाटील (सबगव्हाण) बाळकृष्ण पाटील( गणपुर) आरिफ शेख (चोपडा) नंदकिशोर सांगोरे (हिंगोणे) विजय पाटील (मामलदे) सुनील शिंदे (चुंचाळे) जगतराव आप्पा( शिरसोली) कडू आप्पा पाटील (किनगाव) किरण पाटील (हातेड) अतुल पाटील ,प्रशांत चौधरी( चहार्डी )उपस्थित होते

. या निवेदनाच्या प्रती मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,कृषिमंत्री यांनाही देण्यात आल्या असून दीर्घायुषी मोह वृक्ष पर्यावरण पूरक, भौगोलिक मक्तेदारी असलेल्या परकीय चलन मिळवून देणारा वन औषधी वृक्षाच्या विकासासाठी शासनाने स्वदेशी वृक्ष लागवडीचे विशेष धोरण राबवावे व त्या साठी विकास समिती स्थापन करून नियमात बदल करण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे . मंडळ प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांनी शेतकरी हितासाठी शासन योग्य ती भूमिका घेईल असे सदस्य शेतकऱ्यांना सांगितले.