कोरोना काळातील दिपक – स्तंभ
चोपडा प्रतिनिधी :

माय मरो आणि मावशी जगो
असाच काहीसा अनुभव कोरोना काळात लोकांना पहावयास मिळाला. यामध्ये जणू जगाचे मातृत्व हरपलेच होते आणि मावशी रुपी योद्धांनी आपला दुःखाचा पदर खेचून परिस्थितीला सामोरे गेले यामध्ये डॉक्टर, नर्स, हॉस्पिटल मधील प्रत्येक कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, एस टी वाहक – चालक आणि शिक्षक सुद्धा.

आपण सुद्धा दुःखात काहीतरी खारीचा वाटा उचलावा म्हणून चोपड्यातील महाजन क्लासेसचे संचालक दिपक महाजन यांनी तो वाटा उचलला. एक दिप हा अनेक माध्यमातून समाजात चमकत राहिला 2020 चा लॉकडाउनच्या कालखंडामध्ये बंद पडलेले शिक्षण सुरू व्हावे यासाठी यांनी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडून ठेवले. लग्न सोहळे, इतर सर्व व्यवहार बंद असताना लोकांच्या हातात पैसा नसताना फक्त मुलांना शिक्षण मिळावे यासाठी दिपक महाजन सरांनी अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना अत्यल्प फी घेऊन शिक्षणाशी जोडून घेतले. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा आलेख उंचावण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित केले. विद्यार्थ्यांचा इंग्रजी वर्तमानपत्र वाचण्याचा सराव करून घेतला, त्यांचा शब्द साठा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे इंग्रजीतून संवाद साधत असतात हा चोपडा शहरातील विश्वास लोकांचा आहे.तर दहावीच्या निकालात सदैव अग्रेसर नाशिक बोर्डात येणारे त्यांचे विद्यार्थी आहेत. स्वतः इंग्रजी शिकवुन पालकांना सुद्धा इंग्रजी विषयाचा लढा त्यांनी लावला. विशेष म्हणजे हे कार्य त्यांनी कोणत्याही मदतनिस शिवाय केले . ते स्वतः क्लासमध्ये शिकवतात म्हणून त्यांना सर्व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा सखोल अभ्यास आहे. हे अग्निदिव्य आजही असेच निर्विघ्न सुरू आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरात राहावे म्हणून सरांनी पहिल्यांदा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मौखिक अवगत करत राहिले परंतु लोक ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर तेव्हा दिपक महाजन सरांनी संदिप बाविस्कर सर यांच्या मदतीने एक बोर्ड तयार करून दररोज रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी कोरोना पालनाच्या सूचना ते लिहून ठेवत असत त्यामध्ये मास्क लावणे, नियमित हात धूने, घोळका करून उभे न राहणे, दोन फुटाचे अंतर ठेवणे अशा सूचना लिहून ठेवल्याहोत्या आणि त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत झाली व त्यांच्या प्रयत्नांनमुले फरक पडला असे अनेक लोक विश्वासाने सांगु लागले. सरांनी बऱ्याच लोकांना हॉस्पिटलला घेऊन त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात सुद्धा मदत केली.
बाबअमळनेर तालुका जवखेडा या गावातील इयत्ता दहावीच्या गरीब विद्यार्थ्यांची एक किडनी निकामी असल्याचे सरांनी कळाले त्याला आर्थिक मदतीची गरज होती अशी बातमी वर्तमानपत्रात आली होती. त्याला प्रतिसाद म्हणून सरांनी ५००० रु ची त्या विद्यार्थ्याला मदत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता संकल्पनेचा एक दूत म्हणून सर आज पर्यंत कार्यरत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी ग्रामीण पोलीस टेशन, धनवाडी फाटा व स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी स्वच्छता करून एक संदेश समाजात रुजवला. त्याचप्रमाणे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक व्यक्ती एक झाड त्यांनी लावण्याचा उपक्रम हाती घेतला व अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले. अशा प्रमाणे सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे मागील काळात हिवाळ्यात सातपुड्याच्या पर्वताच्या रांगेत वसलेल्या उत्तम नगर हे एक छोटेसे गाव आहे . या गावात गरीब आदिवासी मुला- मुलींना,महिला व पुरुषांना उबदार कपडे त्यांनी भेट म्हणून दिले.
अशाप्रकारे दिपक सरांनी क्लास हे क्षेत्र नसून एक सामाजिक संस्था म्हणून अनेक उपक्रमातून सामाजिक कार्य त्यांनी केले तसेच चि दुर्गेश नरेश पाटील चि पार्थ अजित पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात ९५ गुण मिळवून नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला.एक योद्धा म्हणून त्यांचा हा कार्याचा गौरव आपणास लक्षात येतो.