चोपडा नगरपरिषद प्रशासनाकडून कठोरा शेतकरी व ग्रामस्थांचा मानसिक छळ सुरूच ;चोपडा शहरास पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या पाईपलाईन योजनेला समस्त कठोरा ग्रामस्थांचा कडाडून विरोध …
चोपडा शहरास पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या पाईपलाईन योजनेला समस्त कठोरा ग्रामस्थांचा कडाडून विरोध …
चोपडा प्रतिनिधी :—-
चोपडा शहर पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या पाईपलाईन करण्याला कठोरा ग्रामस्थांचा कडाडून विरोध असून देखील व कठोरा ग्रामपंचायतीचा ठराव नसतानाही कठोरे गावाजवळील तापी नदी पात्रात पाणी शिल्लक नसताना चोपडा नगरपरिषद कडून पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने पाईपलाईन करण्यांत येत आहे. या कामामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचा नुकसान होणार आहे.तसेच सततच्या पाणी उपसामुळे परिसरातील भूजल पातळी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे आणि त्यामुळे बागायती क्षेत्रावर परिणाम होत आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे.

चोपडा नगरपरिषद कडून कठोरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नसुन गावातून पाईपलाईन टाकण्याचा घाट बांधला जातो आहे. या कामासाठी चोपडा नगरपरिषद कडून कठोरा ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना (साम दाम दंड) वापरून धमक्या देण्यात येत आहेत..
चोपडा नगरपरिषद कडून ग्रामस्थांचा ,विशेष शेतकऱ्यांचा मानसिक छळ होत असून यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
जोपर्यंत ग्रामस्थांच्या मागण्या या कराराच्या स्वरूपात मान्य होत नाहीत ,तोपर्यंत समस्त ग्रामस्थ या कामास कायमस्वरुपी विरोध करणार आहेत तसेच जोपर्यंत या विषयावर शासनाकडून अधिकृत तोडगा निघत नाही तोपर्यंत चोपडा नगरपालिका प्रशासनाने कठोरा ग्रामस्थांना विनाकारण मानसिक आणि प्रशासकीय त्रास देऊ नये. अन्यथा त्यांच्या त्रासाच्या विरोधात गावातील शेतकरी कुटुंब आणि संपूर्ण नागरिक सामूहिक आत्महत्या करु आणि त्यास संपूर्ण जबाबदार म्हणून नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी नगरपरिषद प्रशासनाकडे रास्त मागण्या केल्या आहेत त्यात १) शासन निर्णय नुसार पाणी पुरवठा योजनेसाठी जलस्रोतांचा विकास बंधनकारक आहे आणि त्यानुसार तापी नदी पात्रात बांध/धरण करणे आवश्यक आहे. परंतु नगरपालिका किंवा तापी महामंडळ यांच्या कडून जुन्या आणि नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत.
२) जर बांध/ धरण करणे शक्य नसेल तर तापी नदी पात्रात बारमाही जिवंत जलसाठा असणे बंधनकारक व्हावे, त्यासाठी तापी नदीपात्रातील कठोरा हद्दीतील डोहाचा ‘ जिवंत जलसाठा आणि मृत जलसाठा’ याची व्याख्या तयार करण्यात यावी आणि त्यानुसार नदीपात्रात दिशानिर्देश लावण्यात यावेत.
मृतसाठेतून पाणी उपसा करण्यास कायमस्वरूपी बंदी असावी आणि त्यासाठी कठोरा ग्रामपंचायत, चोपडा नगरपालिका आणि तापी महामंडळ यांच्यात अधिकृत करार व्हावा.
३) तापी पात्रातील पाणी उपसा यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नातुन कठोरा ग्रामपंचायतला रॉयल्टी स्वरूपात उत्पन्न दयावे, त्यासाठी कठोरा ग्रामपंचायत, तापी महामंडळ आणि चोपडा नगरपालिका यांच्या करार करण्यात यावा.
४) पाईपलाईनच्या कामामुळे होणाऱ्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना काम सुरू होण्याच्या आधी देण्यात यावी.
५) जुन्या आणि नव्या पाईपलाईन यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे आणि शेतीचे नुकसान याची भरपाई आणि त्यावर प्रतिबंधक कारवाही ही दोन दिवसात करण्यात यावी, त्यासाठी चोपडा नगरपालिकेने कठोरा ग्रामपंचायतशी करार करावा.
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ यांचा कामास कायमस्वरूपी विरोध असेल असे कठोरा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी मुख्याधिकारी न प चोपडा , तहसीलदार , प्रांताधिकारी , जिल्हाधिकारी , तापी महामंडळ , पोलीस प्रशासन , मुख्यमंत्री कार्यालय इत्यादी ठिकाणी पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे .
जर ग्रामस्थांच्या मागण्या मान्य नाही झाल्यास सामूहिक आत्मदहणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे . सदर पाईपलाईन योजनेला अशोक पाटील , दिनेश पाटील , पंकज पाटील , दिपक पाटील , समाधान पाटील , विजय पाटील , सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , सर्व शेतकरी व विशेष कठोरा गावातील सर्व तरुण मंडळींचा कडाडून विरोध आहे .
