चोपडा काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध करून केले धरणे आंदोलन..
चोपडा प्रतिनिधी —-

३० मे रोजी मोदी सरकारच्या केंद्र सरकारला सात वर्ष पूर्ण झाली. या सात वर्षाच्या काळात देशाचा विकास न होता देश भकास झाला. सर्व स्तरावर मोदी सरकारला अपयश आले म्हणून चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा धिक्कार करण्यात येऊन निषेध करण्यात आला .काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाली. खतांचे भाव वाढले प्रचंड तेलाचे भाव वाढले .खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले .धर्माधर्मात बेदिली निर्माण झाली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली. उद्योग बंद पडले.

शेतमजूर ,शेतकरी व कामगार विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोरोनाच्या महामारीला केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. नोटबंदीचा कार्यक्रम पूर्णपणे फेल झाला .जीएसटीचा चुकीचा निर्णय म्हणून व्यापारी व मध्यमवर्गीय संकटात सापडला. प्रत्येक क्षेत्रात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश भकास होत चालला आहे. सरकारी मालमत्ता विक्रीला काढले आहेत .देशात अशांततेचे वातावरण आहे. या सर्व गोष्टीला भाजपाचे मोदी सरकार जबाबदार आहे .म्हणून अशा सरकार विरोधात जनजागृती करण्यासाठी चोपडा शहर आणि तालुका काँग्रेसचे हे आंदोलन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एड संदीप पाटील व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार चोपडा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के डी चौधरी यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण सोनवणे, रमाकांत सोनवणे ,प्रदीप पाटील , राजेंद्र भास्करराव पाटील, इलियास पटेल, श्याम शिंपी आदी सहभागी झाले. यावेळी राजेंद्र पाटील यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. शेवटी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पाठीशी देश उभा असल्याचे सांगण्यात आले. सुरूवातीला महात्मा गांधींना विनम्र अभिवादन करण्यात आले….