अनेर धरणातून चोपडा तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा
आ.सौ.लताताई सोनवणे व मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

आज दिनांक ०७/०५/२०२१ रोजी अनेर धरणाचे पाणी अनेर नदीत सोडण्यात आले. चोपडा तालुक्यातील अनेर नदी काठावरील १७ गावांमध्ये शेतासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कुंपननलिकांची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत असुन ऐन उन्हाळ्यात या गावांमधील पाणीपुरवठ्यासाठी व शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पुरेसे पाणी देण्यास अडचणी येत असल्याने दिनांक १५ एप्रिल रोजी आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी मा.जिल्हाअधिकारी साहेब, धुळे, जिल्हा धुळे यांना अनेर धरणातून अनेर नदीत पाण्याचे आवर्तने सोडण्यासाठी यांनी वेळोवेळी पञव्यवहार केले होते

तसेच यासाठी पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांचे सहकार्याने व आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने चोपडा तालुक्यातील अनेर धरणाचे आवर्तन अनेर नदीत सोडण्यात आल्याने अनेर नदी काठावरील १७ गावांमध्ये शेतासाठी पाण्याचा उन्हाळ्यातील पाणी टंचाईचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
अनेर धरणाचे आवर्तन अनेर नदीत सोडण्यात आले यात्याप्रंगी एम व्ही पाटील सर पंचायत समिती सदस्य, सुकलाल कोळी शिवसेना तालुका संघटक, गोपाल चौधरी युवा सेना तालुका प्रमुख, दिलीप पाटील विटनेर, किरण पाटील गनपुर, अशोक पवार वेळोदे, किरण देवराज गंलगी उपतालुका संघटक, योगेश रायसिंग माजी सरपंच विटनेर, दिपक कोळी गणपुर, हेमंत वाणी गलंगी, प्रमोद पाटील, बाबूलाल पाटील गणपुर आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
