ममता सरकारने हिंसाचार व अत्याचार थांबवावा , भाजपतर्फे निदर्शने व तहसीलदारांना निवेदन

चोपडा प्रतिनिधी :- सचिन जैस्वाल
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या राज्यभर हिंसाचार सुरू आहे . हिंसाचार त्वरीत थांबवावा या आशयाचे निवेदन चोपडा भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करून नायब तहसिलदार राजेश पउळ यांना देण्यात आले .

पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा प्रदान करून राज्यात शांतता , कायदा व सुव्यवस्था निर्माण करावी .नुकत्याच पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे असून काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत .त्यात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचे खून करणे , आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या बावीस कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आलेली असून , चार हजाराच्या वर घरे जाळण्यात आली आहेत तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत .तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयांना आग लावण्यात आल्याने हे लोकशाहीची हत्या आहे स्त्रियांवर बलात्काराच्या सुद्धा घटना घडत आहेत .पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या रक्तरंजित हिंसाचाराच्या भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करीत आहे तसेच पश्चिम बंगालमध्ये राज्यघटनेची पायमल्ली होत असून भारतीय राज्यघटनेच्या हा अपमान आहे.

लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीची असा हिंसाचार होणे भविष्यात देशालाही हे घातक आहे तरी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना सुरक्षा प्रदान करून राज्यात शांतता , कायदा व सुव्यवस्था निर्माण करावी अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी पंकज पाटील ( तालुकाध्यक्ष ) , गजेंद्र जयस्वाल ( शहराध्यक्ष ) , राकेश पाटील ,विजय बाविस्कर ,संजय श्रावगी , रंजना नेवे , दीपक लोहाणा , प्रवीण चौधरी ,प्रकाश पाटील, मोहित भावे ,दिनेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते….