महाराष्ट्र 9

नगरपालिकाने आता तरी कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग सोडावे शिवसेना शहराध्यक्ष आबा देशमुख यांचा घणाघात

[espro-slider id=13780]

नगरपालिकाने आता तरी कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग सोडावे शिवसेना शहराध्यक्ष आबा देशमुख यांचा घणाघात


चोपडा प्रतिनिधी :—–
चोपडा स्मशानभूमीतील अर्धवट प्रेत जळाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून सदर घटनेबद्दल तीव्र आरोप व संताप शिवसेनेचे शहराध्यक्ष आबा देशमुख यांनी घेतला आहे .स्मशानभूमीत सरण संपले म्हणून प्रेतांची अवहेलना होत आहे असा शिवसेना शहराध्यक्ष यांनी आरोप केला आहे . सरण संपल्याचे स्मशानभूमीतील कर्मचारी किशोर पवार व कार्यालयीन निरीक्षक निलेश ठाकूर यांनी मान्य केले असताना नगर पालिका गटनेते जीवन चौधरी सरण असल्याचा खोटा आव आणत आहेत असा घणाघाती आरोपही केला आहे .


मृतदेहाच्या शेवटच्या क्षणी अंत्यसंस्कार सर्व सोपस्कार पद्धतीने व्हावेत अशी सर्वांची इच्छा असते . सरणाच्या ठेकेदाराचीही चौकशी व्हावी व गटनेते जीवन चौधरी व नगरपालिकाने लोकांच्या विश्वासाला पात्र व्हावे ,त्यांनी जनतेची सेवा करावी आणि आता तरी नगरपालिकाने कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग सोडून लोकांचे खरोखर प्रश्न सोडवावेत असे आवाहन शिवसेना शहराध्यक्ष आबा देशमुख यांनी केले आहे .


शिवसेना नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करीत असते . मी व्हिडिओ खोट्या प्रसिद्धीसाठी केलेले नाहीत . स्मशानभूमीत दीडशे लोकांसमोरचे वास्तव व भीषण परिस्थिती व नगरपालिकेच्या भोंगळ कारभार जनतेसमोर मांडला आहे . मी मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारा कार्यकर्ता अजिबात नाही .
गटनेते जीवन चौधरी यांना पत्रकार परिषद घेणे , टेंडर काढणे ,वाटाघाटी करणे ,चिरीमिरी करणे इत्यादी कामांना वेळ असतो पण स्मशानभूमीत खरोखर लाकडे संपले आहेत की नाही याची खात्री करायला त्यांच्याकडे वेळ नसतो असा आरोपही त्यांनी केला आहे . त्यांची स्थिती डोळे असून आंधळे व उलटा चोर कोतवाल को डाटे अशी झाली असल्याचे म्हटले आहे .
गटनेते जीवन चौधरी चोपड्याच्या जनतेला उल्लू बनवित आहेत , नगरपालिकेच्या स्मशानभूमीत आतापर्यंत एकूण किती प्रेते जळाली याचा हिशोब नसल्याच्या त्यांनी सांगितले . नगरपालिकेच्या स्मशानभूमीत खून ,मर्डर , बलात्कार काहीही करून रात्री-अपरात्री कोणीही येऊन प्रेत जाळून जाईल तर या घडणाऱ्या घटनांना कोण जबाबदार असेल? असाही सवाल आबा देशमुख यांनी उपस्थित केला आहे .
नगरपालिका प्रशासन व गटनेते जीवन चौधरी कुंभकर्णाचा सारखे झोपलेल्या अवस्थेत आहेत ,झोपलेला कुंभकर्ण जागा होईल तरच लोकांचा फायदा होईल असेही त्यांनी म्हटले आहे .


चोपडा शहरासाठी रामपूरा भागात नवीन अमरधामचे बांधकाम पूर्ण झाले असून , कोविडच्या भीषण परिस्थितीत प्रेते जाळायला जागा मिळत नाही तरी देखील सदर अमरधाम उपलब्ध करून दिले जात नाही व सदर अमरधामच्या लोकार्पण साठी ते वाट पाहत आहेत .त्यांना फक्त प्रसिद्धीची हाव आहे व जनतेची सेवा त्यांना माहीतच नाही व सदर अमरधाम लवकरात लवकर अशा भीषण परिस्थितीत चोपडा शहर व तालुक्यातील प्रेते जाळण्यासाठी तात्काळ खुले करून द्यावे अशी मागणी आबा देशमुख यांनी केली आहे .
यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील ,नगरपालिका शिवसेना नगरसेवक महेश पवार , विरोधी गटनेते ,नरेश महाजन आदी उपस्थित होते ..

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]