चोपडा ( प्रतिनिधी ) तीन महिन्यापासुन कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असून संपुर्ण देश लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यात वाहतुकीवर देखील बंदी घातली असल्याने शेतकरी सह व्यापारींचा माल पडुन राहत असल्याने माल खराब होवुन नुकसानाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व व्यापारींचे नुकसान होवु नये म्हणुन शासन व राज्य परिवहन महामंडळाने

एस टीची माल वाहतुक सेवा सुरु करण्यात आली आहे . याच अनुषंगाने दि ५ जुन रोजी चोपडा आगारातील माल वाहतुकीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती नारायण पाटील,उपसभापती नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते बाजार समितीत करण्यात आला. यावेळी चोपडा बाजार समितीतील अमृतलाल सोहनराज जैन यांच्या कडुन ८ टन भुसार ( धान्य ) माल न्यू प्रविण प्रोव्हीजन पंकजकुमारजी मुकुंदवाडी औरंगाबाद यांच्या कडे रवाना करण्यात आले.चोपडा यावेळी बाजार समिती संचालक कांतीलाल पाटील, भरत पाटील, मगन सर बाविस्कर, विठ्ठल पाटील, आगार प्रमुख संदेश क्षीरसागर, अनिल बाविस्कर, डि डि चावरे , ए टी पवार व्यापारी धिरज सुराणा,पवन अग्रवाल ,अजितकुमार सुराणा, राजुशेठ छाजेड, अजय अग्रवाल , पुरुषोत्तम अग्रवाल, बबलुभाई, गोटुभाई, जतनशेठ सुराणा बाजार समितीचे सचिव निळकंठ सोनवणे, जितेंद्र देशमुख , एस टी कर्मचारी अशोक बाविस्कर ए आर शिरसाठ, शाम धामोळे, भगवान नायदे सह व्यापारी, हमालमापाडी उपस्थित होते.