चोपडा उपजिल्हा रुग्णालयात सुविधा अभावी होत आहे रुग्णाचे हाल,# रक्त चाचणी(ऍक्युरसी) अचूक येत नसल्यामुळे रुग्णांचा उपचार करण्यात अडचणी येतात. डॉ.चंद्रहास पाटील
चोपडा (प्रतिनिधी) — भव्यदिव्य चोपडा उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधाचा अभाव आहे. काही डॉक्टराच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनता त्रासा पासून त्रस्त झाली आहे.

येथिल उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर असून सुद्धा त्यांचे खाजगी दवाखान्यात जास्त लक्ष असते असा आरोप सामान्य नागरिक करताना दिसतात. चारपाच दिवसांपूर्वी माचला या गावाची रिंगू बारेला ही आदिवासी महिला बाळपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाली येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर चंद्रहास पाटील यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले दोन दिवसानंतर तिला सांगण्यात आले की, तुझी डिलिव्हरीला ८ ते १० दिवस वेळ आहे असे सांगून घरी पाठवून दिले. तद्नंतर दुसऱ्या दिवशीच ती महिलेचे पोटात वेदना व्हायला लागल्यामुळे परत उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट झाली तर दिवस भर उपचारासाठी राहिल्या नंतर रात्री जळपास 9 ते 10 वाजे दरम्यान तिच्या नातेवाईकाना सांगण्यात आले की, ह्या महिलेला जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवावे लागेल.आणि त्यातल्या त्यात रुग्णवाहिका वाल्याचा संप सुरू रात्रीच्या वेळेस आदिवासी कुटुंब कुठे जाणार त्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम ह्यांना बोलवुन संपूर्ण हकीकत सांगितली त्यावर रात्री सिझर करत नाही याबाबत मला लेखी दया व ती सकाळ पासून तुमच्या कडे ऍडमिट असताना तूम्ही तिला रक्ताची आवश्यकता असे का सांगितले नाही आणि इतक्या रात्री तुम्ही तिला जळगाव पाठवत आहे या सर्व बाबीचे मला लेखी दया आणि रिंगू बारेला या महिलेला उपजिल्हा रुग्णालयातुन यांच्या जनसेवा हॉस्पिटला ऍडमिट केले असता अवघ्या १० ते १५ मिनिटांत तिची नॉर्मल डिलिव्हरी झाली तर खाजगी रुग्णालयात नॉर्मल आणि सरकारीत सिझर हे आश्चर्य होय असे अनेकांनाकडून बोलले जात आहे.याचा अर्थ सरकारी कामाची जबाबदारी अंगावर न घेता काम झटकून मोकळे राहणे होय.

ह्या विषयी चर्चा करण्या साठी सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील व गोपाळराव सोनवणे हे उपजिल्हा रुग्णालय प्रभारी डॉ.सागर पाटील यांच्याकडे गेले असता डॉ. चंद्रहास पाटील हे चर्चे साठी समोर यायला पण टाळत होते डॉ.सागर पाटील यांनी तीन वेळा बोलून झाल्यावर पण टाळत होते काही वेळाने चर्चे साठी आले असता गोपाळराव सोनवणे यांनी रक्त कमी नसताना पेशंट ला जळगाव हलवण्याचा सल्ला कसा देण्यात आला यावर डॉ चंद्रहास पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात होणाऱ्या रक्त्याचा चाचण्या (ऍक्युरसी) अचूक येत नसल्या कारण सांगून रुग्णाचा उपचारात अडचण येत असल्याचे सांगितले.व ह्या पुढे असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ असे सांगत काढता पाय घेतला. ह्या विषयी लॅब ह्या वेळी गोपाळराव सोनवणे यांनी हा विषय आरोग्य मंत्री यांचा पर्यंत घेऊन जाणार असल्याचे सांगितले
आमदारांनी घेतली दखल
चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील रिंकू बारेला प्रसूती दरम्यान झालेल्या हलगर्जीपणा बाबतआमदार लताताई सोनवणे यांनी दखल घेत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात विविध विकारांसाठी रुग्ण दाखल झाल्या नंतर त्यांच्यावर योग्य उपचार न करता जळगांव येथे हलविण्याचा सल्ला देतात यात विशेषतः महिला रुग्णांना सुध्दा डिलेवरीसाठी जळगांव येथे हलवीले जाते या मुळे या रुग्णांच्या जिवीतास धोका निर्माण होवू शकतो. या पुढे रुग्णांवर वैद्यकिय उपचारास हलगर्जीपणा केल्यास त्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. तरी या बाबीचा विचार करता आपण रुग्ण सेवेत सुधारणा करावी तसेच संबंधीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताकिद देवून रुग्णांवर चोपडा येथेच उपचार करणे बाबत सुचना करावी.असे पत्र वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा यांना देण्यात आले आहे
