महाराष्ट्र 9

रावेर मतदार संघांत चुरशीच्या लढतीत श्रीराम पाटील बाजी मारणार ?

[espro-slider id=13780]

रावेर मतदार संघांत चुरशीच्या लढतीत श्रीराम पाटील बाजी मारणार ?

रावेर मतदार संघात दि.13 रोजी चौथ्या टप्याचे मतदान शांततेत पार पडल्या नंतर येणाऱ्या 4 तारखेला कोण विजय होणार ते समजणार आहेच संपूर्ण रावेर मतदार संघांत कोण बाजी मारणार यावर काही  काही सोशल मीडिया युनिव्हर्सिटीचा प्राध्यापकांनी मतदानाचा जातीनिहाय अंदाजित आकडेवारी नुसार  25000 मतांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील हे बाजी मारणार असल्याचे भाकीत करून रावेर मतदार सांगत  चर्चेला उधाण आले आहे

अंदाजित आकडेवारी

तसे झाल्यास रावेर मतदार संघात तसे झाल्यास तब्बल तीस वर्षानंतर परिवर्तन बघायला मिळणार तसेच त्यात काही उलटफेर झाल्यास भाजपचे रक्षा खडसे यांनी बाजी  सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याचा विक्रम होईल व रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्री पदा साठी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रावेर लोकसभा मदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. गेली दोन निवडणुकांमध्ये म्हणजेच २०१४ व २०१९ मध्ये रक्षा खडसे ह्या तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. पुढे एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपला जय श्रीराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडवर खडसेंनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.भारतीय जनता पक्षाने अंतर्गत विरोध असूनही रक्षा खडसे यांना २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली.

त्यानंतर खडसेंनी भाजपत येण्याचे जाहीर करून रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले. दुसरीकडे, शरद पवार यांनीही नव्या दमाचे उद्योजक श्रीराम पाटील यांना रक्षा खडसेंच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून मोदींच्या योजनांवर प्रचारात भर देण्यात आला. श्रीराम पाटील यांनी स्थानिक मुद्दे, केळी उत्पादकांच्या समस्या, रोजगार, बेरोजगारी यांसारखे जनतेच्या जिव्हाळ्याचे मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडले. त्यातून त्यांनी रक्षा खडसे यांच्यासमोर आव्हान उभे केले. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात प्रचंड चुरशीची झाल्याचे दिसून आले

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]