महाराष्ट्र 9

विजेचा धक्का लागल्याने कंत्राटी वायरमन चा मृत्यू #कार्यकारी अभियंतासह पाच जणांवर अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

[espro-slider id=13780]

विजेचा धक्का लागल्याने कंत्राटी वायरमन चा मृत्यू #कार्यकारी अभियंतासह पाच जणांवर अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या अडावद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेला तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा बुधवारी सकाळी विजेच्या धक्याने मृत्यू झाला. तर अन्य दोन कर्मचारी जखमी झाले.


याप्रकरणी मयत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच कर्मचा-यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान विजेचा धक्का बसलेल्या वायरमनला अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले असता दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नव्हते. तर वेळेत उपचार न मिळाल्याने वायरमनचा मृत्यू झाल्याचा आरोप या वेळी सरपंचासह ग्रामस्थांनी केला.

अडावद जवळ वटार रस्त्यावरील तुटलेली तार जोडण्यासाठी ८ वाजता कर्तव्यावर गेले होते. यात कंत्राटी वायरमन म्हणून दिलीप मोतीराम बारेला (वय २८, रा. आडगावं) हे विज खांबावर चढले. मात्र, तार जोड़त असताना खांबावरील विद्युत प्रवाह सुरू असल्याने ६ रोजी सकाळी त्यांना विजेचा जबर धक्का बसला अन् ते खाली पडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबतचे लाईनमन राहुल मनोरे आणि सत्यनारायण वाघ हे देखील जखमी झाली आहेत. या प्रकरणी मयताचे भाऊ सुरेश मोतीराम बारेला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सचिन केदारे, उपकार्यकारी अभियंता साळुंखे, कार्यकारी अभियंता रमेश पवार, ठेकेदार सुमित चौधरी, कर्मचारी नोगेश पाटील या पाच जणांवर विद्युत सुरक्षा विषयक साहित्य न पुरवणे तसेच विद्युत पुरवठा सुरू ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय थोरात तपास करीत आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]