4, फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त विशेष
कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपले पुढचे आयुष्य समाजभिमुख कार्या साठी समर्पित करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे राज मोहम्मद खान शिकलगर
चोपडा,
कॅन्सर हा आज जगात झपाट्याने वाढत असलेला आजार आहे लाखो लोक याआजारातून मृत्यु चा दाढेत जात आहे पूर्वी काही दशकापूर्वी नाममात्र कॅन्सर चे रुग्ण आढळायचे लोकांना नवल वाटायचे पण आता प्रत्येक शहरात शेकडोंच्या संख्येने कॅन्सर चे रुग्ण आहे कॅन्सर तसा एक प्रकारचा नाही कॅन्सरचे अनेक रूप आहे पण अश्या जीवघेण्या आजारावर मात करून जिद्दीने आपले आयुष्य जगणारे फार कमी भाग्यवंत असतात ज्याला परमेश्वर आयुष्य बोनस म्हणून भिक्षेत देतो आज जागतिक कॅन्सर दीना निमित्त असे प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे राज मोहम्मद खान शिकलगर यांचे देता येईल.

राज मोहम्मद यांना 2010 मधे तंबाखू गुटखा च्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर झाला त्यांनी उपचार दरम्यान मृत्यू यातना सहन केली व राज मोहम्मद याला खरा जीवनाचा अर्थ कडला जीवन किती सुंदर आणि अनमोल आहे व आपल्या कडून झालेली चूक सुधारता येईल का आपण पूर्वी सारखे होणार नाही आपल्या चेहरा चा एक भाग कापला गेलं आहे जर अल्लाह ने पुढचे आयुष्य भिक्षेत दिलेतर आपल्याला ज्याचा मुळे कॅन्सर झाला ते दुसऱ्या ला होणार नाही व ज्या कॅन्सर मुळे आपण मृत्यू यातना सहन केले त्या पासून लोकांना जागरूक करणे असे पर्ण केले व परमेश्वराने राज यांना जीवनदान दिले .

भिक्षेत आयुष्य मिळाल्या नंतर राज मोहम्मद यांनी महिन्यातून 12 ते 15 दिवस व्यसनमुक्ती अभियान व कॅन्सर जनजागृती अभियान साठी राखीव ठेवले त्यांचा या संघर्षमय जीवनात अनेक कठिण प्रसंग आले पण राज घाबरले नाही व जिद्दीने जीवन जगत राहिले जिल्हा प्रशासन ने ही त्यांचे कार्यची दखल घेतली आणि त्यानं जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती मधे अशासकीय सदस्य म्हणून घेतले तसेच तंबाखू मुक्त अभियानाचे ब्रॅण्ड एमबेसेडर बनवले व तंबाखू मुक्त शाळा अभियानात मार्गदर्शक म्हणून उत्तम कार्य केले व शिक्षण विभाग आरोग्यविभाग, सलाम मुंबई फौंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांचा सोबत जळगाव जिल्हा तंबाखू मुक्त शाळेचं करून दाखवले.

जन मानवता बहुउद्देशीय संस्था द्वारे कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर तुन राज्यात हजारो कॅन्सर रुग्णांना उपचारात मदद व मार्गदर्शन केले शेकडो लोकांना व्यसनमुक्त केले दिपावली, व रमजान या पवित्र सणी रुग्णाचा परिवाराला रेशन किट वाटप करतात ,विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कॅन्सरग्रस्त परिवारातील मुलींना लग्न कार्या साठी मदद करतात हे सर्व कार्यात त्यांना दानशूर व्यक्ती मदद करतात आता कॅन्सर पेशनट पुनर्वसन केंद्र द्वारे 40 परिवाराचे शिलाई मशीन देऊन पुनर्वसन करत आहे.
राज मोहम्मद याना बरेच पुरस्कार व मानपत्र मिळाले आहे आता त्याचे कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे त्यांना टोबॅको फ्री इंडिया या राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे 16 फेब्रुवारी त्यांना नई दिल्ली येते सम्मानित केले जाणार आहे जळगाव जिल्ह्यासाठी हे अभिमानाची बाब आहे
कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपले पुढचे आयुष्य समाजभिमुख कार्या साठी समर्पित करणारे असे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ला परमेश्वर दिर्घआयुष्य देवो