महाराष्ट्र 9

चोपडा येथे शिवकृपा कॉटस्पिन प्रायव्हेट लिमिटेड चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा हस्ते..

[espro-slider id=13780]

चोपडा येथे शिवकृपा कॉटस्पिन प्रायव्हेट लिमिटेड चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा हस्ते..

चोपडा प्रतिनिधी :–

शिवकृपा कॉटस्पिन प्रायव्हेट लिमिटेड उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांनी केले.प्रास्ताविक मध्ये गेल्या100वर्षापासून चोपडा तालुका कापसाचे आगार आहे.जिनिंग व्यवसाय हा फारच जुना आहे.शेजारील राज्यात चोरट्या मार्गाने कापसाची वाहतूक झाल्याने या जिनिंग उद्योगास घरघर आली.जिनर्स ने उद्योग बंद केले.1997मध्ये युतीचे सरकार होते कापसाचे भाव वाढतील या आशेने उद्योग सुरू केला.2002मध्ये शासनाने खाजगी कापूस खरेदी करण्यास परवानगी दिल्याने आठ ते दहा जिनिंग सुरू झाल्यात.2017मध्ये स्वतःची कॉटन स्पिन उभी केली.70कोटीचा प्रोजेक्ट उभा केला.कुठलाही उद्योग तोट्यात नसतो ती आपली सवय असल्याचे यावेळी घनश्याम भाई अग्रवाल यांनी सांगितले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील तर व्यासपीठावर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,आमदार किशोर पाटील,आमदार लताताई सोनवणे,माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,माजी आमदार डॉ बी एस पाटील,जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार, उमेश नेमाडे, माजी जी प सदस्य डॉ सुरेश पाटील,सुनिल अग्रवाल तसेच कोईम्बतुर येथील उद्योजक एम शंकरजी,स्टेट बँक मुबंई श्रीमती मैरीजी धनपाल,टी एम डी चे उद्योजक प्रदीप रॉय,उद्योजक श्रीकांत गजबी,नागेश्वर शर्मा मुंबई, ॲड घनश्याम पाटील,पंकज बोरोले जीवन चौधरी नंदकिशोर पाटील आशिष गुजराथी, डॉ सुरेश पाटील, सूनिल जैन, चंद्रशेखर पाटील,आदी उपस्थित होते.

* गिरीष महाजन*


यावेळी कार्यक्रम छोटा असेल असे वाटले देश पुढे चालले आहे पंतप्रधान यांचे स्वप्न विकसित भारत ते पूर्ण करायचे आहे तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे हा तरुण पुढे कसा जाईल असा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे जळगाव जिल्हा केळी प्रमाणे कापसाचा उत्पन्न चांगले आहे कापूस येथे आहे आणि उद्योग 600 किलोमिटर आहेत या जिल्ह्यातच कारखाने यावेत शासानापुढे मांडणार आहे जामनेरला ही खाजगी उद्योग उभा राहणार आहे.गिरण्या कुणी लावायच्या गुजराथी अग्रवाल पटेल यांनी करावे आम्हाला इकडे जमत आहे तिकडे जाव.30वर्षात काय केले काहीच नाही जे जमत तेच करावे.सहा टर्म झालेत दादांची पहिली टर्म आहे.आमचे तीस वर्ष गेलेत राजकारणात..उद्योग उभा राहायला पाहिजे.मधल्या काळात ब्रेक होता पण आता संबंध चांगले आहेत. उद्योगांमुळे देशाला आर्थिक प्रगती मध्ये चालना मिळते.या व्यवसायाला मरण नाही, मंदी नाही.रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे सांगितले

गुलाबराव पाटील :–

जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न चांगले.पूर्वी कापूस मध्य प्रदेश मध्ये जावू देत नव्हते धरणगाव २.५लाख गाठी तयार होतात ३४ तक्के गाठी तयार होतात पण त्या प्रमाणे उद्योग नाहीत तीन मंत्री आहोत तिघांनी विचार करावा पवार बसले आहेत अजित पवार काहीही करू शकतात आपण तिघांनी प्रेमाने सांगितले तर निर्णय होवू शकतो कापूस व केळी या शिवाय काहीच नाही.बी टी २ वर अटकलो आहे.
सत्तेत असलेले कापसाच्या भावाच्या बाबतीत चर्चा करीत होतो.शेतकऱ्यास इतका खर्च लागतो मग शासनात असणारे कापसाला भाव का देत नाही.?
आमचा धंदा ही चांगला राहिला नाही कार्यकर्ते थांबत नाही अरूणभाई तुमच्या वेळेस बर होत गाय वासरू नका विसरु..? कार्यकर्ते नाराज होतात काम केले नाही तर पळून जातात पाच वर्षांनी परीक्षा द्यावी लागते.नापास झालो तर १७ नंबरचा फॉर्म भरून काम करावे लागते.भाई वर कधीही टीका करा कधी बोलत नाहीत राजकारण ठिकाणी राजकरण असते अनेक पक्षाचे लोक एकाच व्यासपीठावर येतात ही राजकारणा साठी गौरवाची बाब असल्याचे सांगितले.

अरूण भाई गुजराथी :–


उद्योग सर्वात महत्वाचा आहे राष्ट्रीय उत्पन्न वाढते सूतगिरणी अडचणीत आहेत.पण आता गिरण्यांची अवस्था वाईट आहे. जिल्ह्यातील मोठी मिल आहे.
मी मंत्री होतो हे लोक लक्षात ठेवतात हे कमी नाही.महाराष्ट्रातून ८० टक्के कापूस बाहेर जातो जिल्हा बँक अध्यक्ष १० गिरण्यांना पैसे द्या तुम्ही काही केले नाही ते करावे लागेल आमच्या कडून पळवून नेले हे काही कमी नाही .

अनिल पाटील

चोपड्या सारख्या छोट्याशा शहरात एवढं मोठा प्रकल्प उभा केला.सामाजिक कार्य करीत आहेत.आपणास कायम यश मिळणारच आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]