तरुणाईच्या उत्साहात सागरभाऊ ओतारी यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक जाणीव!
चोपडा – वाढदिवस हा केवळ उत्सव नसतो तर आपली जबाबदारी वाढवणारा दिवस असतो याचे भान ठेवत शहरातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील चेहरा असलेले युवा नेतृत्व श्री सागरभाऊ ओतारी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सागरभाऊंचा वाढदिवस साजरा करतांना तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. दिवसभर विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरभर बॅनर्स
सागरभाऊंना शुभेच्छा देणारे असंख्य फ्लेक्स, बॅनर्स शहरभर झळकत होते. चोपडा शहरातील चौकाचौकात सागरभाऊंना शुभेच्छा देणारे आकर्षक बॅनर्स प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. या असंख्य बॅनर्समुळे सागरभाऊंची लोकप्रियता अधोरेखित झाली. चोपडा शहरातील नागरिकांसाठी सागरभाऊंच्या समर्थकांचा हा उत्साह नवा नसला तरी कोणत्याही पदावर नसतांनाही वर्षागणिक सागारभाऊंच्या लोकप्रियतेत होणारी वाढ कौतुकाचा विषय बनली आणि प्रत्येक नागरिकाने सागरभाऊ ओतारी यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त सकाळीच सागरभाऊंनी आपल्या मातोश्री श्रीमती रेखाबाई ओतारी यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला व दिवसाची सुरुवात केली. मातोश्रींचा आशीर्वाद घेतल्यानंतर सागरभाऊंनी शहरातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक, समर्थक, माताभगिनींसह कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा महापूर पाहायला मिळाला. सागरभाऊ ओतारी मित्र परिवाराकडून दिवसभराच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

जपले सामाजिक भान
मित्र परिवाराकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असले तरी या आनंदोत्सवात सागरभाऊंनी आपले सामाजिक भान जपत शहरातील देवस्थानांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. सर्वप्रथम तारामती नगरातील श्री साईबाबा मंदिर व श्री हरेश्वर मंदिरात सागरभाऊंनी पूजा केली. यानंतर राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करीत या राष्ट्रपुरुषांच्या विचारावरच आयुष्यभर मार्गक्रमण करण्याचा संकल्प सागरभाऊ ओतारी यांनी केला. ज्या तरुणाईला सागरभाऊ मार्गदर्शन करून दिशा देण्याचे काम करतात त्याच तरुणाईच्या प्रेम आणि उत्साहाच्या लाटेवर स्वार होत, त्यांनी केलेले नियोजन आणि ते सांगतील त्या प्रमाणे वागत सागरभाऊंनी आपला संपूर्ण दिवस या तरुणाईच्या स्वाधीन केला होता. वाढदिवस साजरा करताना सामाजिक भान जपा, कार्यक्रम कोणताही घ्या पण त्या कार्यक्रमातून सामाजिक हित जपले गेले पाहिजे या सागरभाऊंच्या सूचनांचे तंतोतंत पालन तरुण कार्यकर्त्यांनी केले.

जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपले ।।
तोची साधू ओळखावा। देव तेथे चि जाणावा ।।
या जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगा प्रमाणेच जीवनात आचरण करणाऱ्या सागरभाऊंचा वाढदिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी सागरभाऊ मित्र परिवाराने चोपडा वेले येथील अमर संस्था संचलित अनाथ मुला-मुलींना सागरभाऊंच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी सात्विक भोजनाचा आस्वाद घेतांना मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान तृप्ततेची जाणीव करून देत होता. याप्रसंगी सागरभाऊं ओतारी यांना शाल श्रीफळ देऊन अमर संस्थेचे शेषराव पाटील यांनी सर्व मुलांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात व चोपडा शहरातील परिश्रम हॉस्पिटल येथे कन्या रत्नांना जन्म दिलेल्या मातांचे साडी चोळी, पुष्पगुछ, बाळाचे कपडे व पेढे देऊन सत्कार करण्यात आला, बेटी बचाव बेटी पढाव.. असा संदेश यामाध्यमातून सागरभाऊंनी सर्वांना दिला.
त्यानंतर शहरातील अशोक नगर येथे ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ज्यांच्या अंगणात वृक्ष लावण्यात आला त्या घरातील व्यक्तीच्या हस्तेच वृक्षारोपण करण्यात आले. सामान्य माणसाला वृक्षारोपणाचा हा आनंद फक्त सागरभाऊंचं देऊ शकतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या या रोपांचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प याप्रसंगी नागरिकांनी करून सागरभाऊंना अनोख्या शुभेच्छा दिल्या. सकाळ पासून सागरभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी चोपडा शहर, तालुका आणि जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकसह बँकिंग क्षेत्रातील मान्यवरांसह सामान्य नागरिकांची रीघ लागली होती. दिवसभर सागरभाऊंनी शुभेच्छाचा स्वीकार केला. मात्र, सागरभाऊंवर प्रेम करणाऱ्या तरुणाईला वेध लागले होते ते अभिष्टचिंतन सोहळ्याचे. सागरभाऊ ओतारी मित्र परिवाराने या भव्य आणि दिव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे श्री साईबाबा मंदिर परिसरात आयोजन केले होते त्याठिकाणी सागरभाऊंचे आगमन होताच तरुणांनी एकच जल्लोष केला.
शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख यांनी सागरभाऊंच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख याप्रसंगी केला. सागरभाऊ यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितलं. त्यानंतर सागरभाऊ ओतारी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी शेकडो तरुणांसह माताभगिनी आणि नागरिक उपस्थित होते. त्यानंतर शहरातील अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव केक कापण्यात आले..
याप्रसंगी दिवसभर शेकडो कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होतेच परंतु वरिष्ठ जेष्ठ नागरिक, माताभगिनी आणि लहान मुलांची हजेरी देखील लक्षवेधी होती..
