महाराष्ट्र 9

चोपड्यात बाजार समिती निवडणुकीत २७३ पैकी २०१ उमेदवारांची माघार तर ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात

[espro-slider id=13780]

चोपड्यात बाजार समिती निवडणुकीत २७३ पैकी २०१ उमेदवारांची माघार तर ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात..


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क

सहकार क्षेत्रातील महत्वाची समजली जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यात २८९ उमेदवारांनी विक्रमी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत दहा उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर २७९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यानंतर सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने २७३ उमेदवार रिंगणात होते. दरम्यान आज गुरुवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी २०१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणुकी ७२ उमेदवार रिंगणात आहेत. बाजार समिती निवडणुकीत गेल्या दोन दिवसात बरीच राजकीय उलथापालथ बघायला राजकीय तडजोडी होऊन तीन पॅनल मध्ये चुरशीची लढत होत आहे. त्यात राष्ट्रवादी, भाजपाचे एक पॅनल, राष्ट्रवादीचा नाराज गट, काँग्रेस, डॉ. सुरेश पाटील यांचे एकत्रित एक पॅनल तर सेनेचा शिंदे गट व भाजपचा दुसरा गट असे एक पॅनल अशी तिरंगी लढत अटळ आहे.

मात्र सहकाराच्या निवडणुकीत जेष्ठनेते अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली होणारा सर्वपक्षीय पॅनलचा प्रयोग या निवडणुकीत खंडित झाला आहे. बाजार समितीचा निवडणुकीत २८९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुक चुरशीची होईल असे चित्र सुरुवाती पासून दिसत होते. माघारीच्या शेवटच्या दिवशी त्यावर अखेर शिक्का मोर्तब झाला. गेल्या चार दिवसापासून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादीचा नाराज गट यांच्यात राजकीय तडजोडीसाठी बोलतांना अनेक बैठका झाल्या तर सुरुवाती पासून शिवसेनेचा शिंदे जेष्ठनेते गट स्वतंत्र होता तसेच त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला होता. परंतु जेष्ठनेते अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व माजी तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, जेष्ठनेते चांद्रशेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा एक गट यांच्यात युती होऊन पॅनल जाहीर झाले तसेच राष्ट्रवादीच्या नाराज गटाचे अड. घनश्याम पाटील, जिल्हा परिषदेचे बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल काँग्रेसचे, चोसाकाचे माजी चेअरमन डॉ. सुरेश पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अड. संदीप पाटील यांचे आघाडीचे दुसरे पॅनल निवडणुकीत उतरले असून, त्यांनी मूळ राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा स्वतंत्र गट होता. तसेच त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला होता.

जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांची भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे घनश्याम पाटील यांच्या गटाशी युती बाबत चर्चा सुरू होती मात्र जागांची तडजोड न झाल्याने अखेर त्यांनी ऐनवेळी शिंदे गटाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या गटाशी तडजोड करून शिंदे गट व भाजपा युतीच्या पॅनल मध्ये भाजपाचे काही उमेदवार दिलेत अशी माहिती दस्तुर खुद्द भाजपचे जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांनी देशदूतशी दिली. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व भाजपाचे एक पॅनल, अड. घनश्याम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांचा राष्ट्रवादीचा नाराज गट, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अड. संदीप पाटील, डॉ. सुरेश पाटील यांचे नेतृत्वात आघाडीचे एक पॅनल तर आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा शिंदे गट आणि जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांच्या नेतृत्वात भाजपचा दुसरा गट असे सेना, भाजपा युतीचे पॅनल अशी चुरसपूर्ण तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीत सरपंच ग्राम संवाद संघटनेचे युवा कार्यकर्ते तथा वेले आखतवाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक सुनील पाटील देखील प्रस्थापितांच्या विरोधात उतरले आहेत. तर काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत आपले भविष्य अजमावित आहेत .

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]