ओम शांती केंद्रामार्फत महाशिवरात्री निमित्त मोफत रुद्राक्ष वाटप…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
ओम शांती केंद्र चोपडा मार्फत महाशिवरात्री निमित्त मोफत रुद्राक्ष वाटप करण्यात आले. या आधी मागील आठवड्यात रोटरी उत्सवात खास नेपाळ या देशातून मागविण्यात आलेल्या रुद्राक्ष पासून शिवलिंग तयार करण्यात आले होते. आणि त्या दरम्यान १५०० रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले होते. भरपूर साधकांना सदर रुद्राक्षांचा छान परिणाम जाणवल्याने त्यांनी पुन्हा रुद्राक्षांची मागणी केली होती. त्यामुळे महाशिवरात्रीचे निमित्त साधून महाशिवरात्रीच्या दिवशी ५००० रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. या रुद्राक्षांना ओम शांती केंद्रातील ब्रह्माकुमारीज भगिनींनी सकाळी तीन वाजेला उठून योग द्वारे रुद्राक्ष चार्ज केले आहेत व त्यात सकारात्मक ऊर्जा भरली आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होत आहे.

शिवपुराणातही रुद्राक्षांचा उल्लेख आहे. शिवपुराणात असे म्हटले आहे की ,जरी लहान असले तरी लहान रुद्राक्ष देखील अत्यंत शुभ आहे. रुद्राक्षांचे महत्व इतके अधीक आहे की, ज्या व्यक्तीने अकराशे रुद्राक्षांची माळा धारण केली तर त्या व्यक्तिला ते अत्यंत गुणकारी असून त्याचे वर्णनही करता येणार नाही. रुद्राक्ष केवळ याचकांनीच नव्हे तर गृहस्थांनीही घातले पाहीजे. विशेषत: जेव्हा शिवपूजा करत असतात तेव्हा परिधान केले पाहिजे.
सदर रुद्राक्ष घेण्यासाठी मोठया संख्येने गर्दी उसळली होती. नेपाळहून आणलेले ५००० रुद्राक्ष संपले असून साधकांनी यापुढे ओम शांती केंद्रात रुद्राक्षची मागणी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

रुद्राक्ष वाटप प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारीज मंगला दीदी, राज दीदी, सारिका दीदी, कांचन भोळे, एम एस पाटील, जगदिश चौधरी, राजेंद्र पाटील, महेंद्र भोळे आदिंनी परिश्रम घेतले…
