महाराष्ट्र 9

सागर ओतारी यांचा प्रयत्नांना यश
चोपडा शहरात होणार तीन दिवसाआड पाणीपुरवठा…!

[espro-slider id=13780]

सागर ओतारी यांचा प्रयत्नांना यश
चोपडा शहरात होणार तीन दिवसाआड पाणीपुरवठा…!

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा, प्रतिनिधी –

पाणी टंचाईची समस्या चोपडा शहरवासीयांच्या पाचवीला पुजलेली आहे. तापी, अनेर, गूळ या जीवनदायीनि नद्या असतांनाही चोपड्यात गेल्या अनेक वर्षांपासून आठ ते पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. मात्र, शहराला समस्यामुक्त करण्याचा संकल्प केलेल्या युवा नेतृत्व सागरभाऊ ओतारी यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थेट पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. सागरभाऊंच्या निवेदनाला प्रतिसाद देत पालिका प्रशासनाने आज पासून चोपडा शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक प्रसिद्धीला दिले. चोपडा पालिकेच्या इतिहासात प्रथमच तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून सागरभाऊ ओतारी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.



आठ ते पंधरा दिवसाआड अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चोपडा शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. महिला वर्गात याबाबत प्रचंड असंतोष आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्धार सागरभाऊ ओतारी यांनी केला. शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेचा अभ्यास करून पालिकेतील लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा हेच पाणीटंचाईचे कारण असल्याची खात्री झाल्यानंतर जनहितासाठी लढ्याचे रणशिंग सागरभाऊ ओतारी यांनी फुंकले.



मात्तबरांना जे शक्य झाले नाही ते सागरभाऊंना काय शक्य होईल? अशक्य मुद्दे उचलण्यात काय हाशील ? असे प्रश्न प्रस्थापितांकडून उपस्थित करून सागरभाऊंचे मनोधर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, राजकीय यश अपयशाचा विचार न करता ३० जानेवारी रोजी त्यांनी आपल्या निवडक सहकारी आणि भगिनींना सोबत घेऊन मुख्याधिकारी हेमंत निकम यांची भेट घेतली. तीन दिवसाआड पाणी पुरवठा कसा शक्य आहे ते मुख्याधिकारी यांना समजावून सांगितले. आणि तुम्हाला शक्य नसेल तर यंत्रणा आमच्या ताब्यात द्या, आम्ही दोन दिवसाआड पाणीपुरवठा करून दाखवू असेहि ठासून सांगत पालिकेला आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा अल्टिमेटम दिला. मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी पंधरा दिवसांचा अवधी मागितला. त्यानुसार पंधरा दिवस तुमचे मात्र, सोळावा दिवस माझा राहील व त्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि पाणीपुरवठ्यातील झारीच्या शुक्राचार्यांना वठणीवर आणू असा इशारा सागरभाऊ ओतारी यांनी दिला होता.



यानंतर, मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून जबाबदारी निश्चित केली. ठेकेदाराला बोलावून काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. शहरांतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेतील उणिवा दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्रंदिवस यंत्रणेला कामाला लावले. अखेर स्वप्नपूर्तीचा क्षण आला आणि चोपडा शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे अधिकृत वेळापत्रकच मुख्याधिकारी निकम यांनी आपल्या स्वाक्षरीने प्रसिद्धीला दिले.

दहा दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शेतात कामाला जाणाऱ्या महिलांना रोजगार बुडवून घरी राहावे लागत होते. पाणी कधी येईल याची खात्री नसल्यामुळे महिलांना नेहमीच चिंता असायची. सागरभाऊंनी आमची समस्यां ओळखली आणि प्रशासनाला दणका दिला. परिणामी आता तीन दिवसाआड पाणी मिळणार असून सागरभाऊंमुळेच हे शक्य झाले असून सर्व महिलांच्यावतीने त्यांचे धन्यवाद.

मनीषा लोहार
गृहिणी

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]