महाराष्ट्र 9

चोपडा न. प. ची अग्निशमन सेवा ऑक्सीजनवर…#चोपडा नगरपालिकेविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर…

[espro-slider id=13780]

चोपडा नगरपालिकेविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर…
चोपडा न. प. ची अग्निशमन सेवा ऑक्सीजनवर…


महाराष्ट्र9न्यूज चोपडा (प्रतिनिधी):-


चोपडा येथे मुख्य बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी चोपड्यातील अग्नितांडवात एकाचा मृत्यू झाला होता. यावेळी नगरपालिकेची कमकुवत व्यवस्था उघडी पडली होती. त्याच्याच विरोधात आज नागरिकांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. या मूकमोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले. यावेळी नागरिकांनी नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जाहीर निषेध केला.


चोपड्यातील मेन रोड वरील सुरेशचंद जैन यांच्या घरासह दुकानाला दोन दिवसापूर्वी भीषण आग लागली होती. जैन हे आपल्या तीन मजली घरात कुटुंबातील सात सदस्यांसह राहतात. या घराच्या खालच्या मजल्यात दुकान तर वरच्या दोन मजल्यांवर ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. जैन यांच्या घराला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुरेशचंद जैन यांचा मुलगा आणि कुटुंबाचा आधारस्तंभ गौरव याचा गुदमरल्याने मृत्यू झाला. आग लागल्यानंतर गौरव हा आपल्या भावांचे प्राण वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेला. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केल्याने तो तेथेच अडकला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी गौरव तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात बसून राहिला. शौचालयातच अडकल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.


आग लागल्यानंतर नगरपरिषदेकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही. या घटनेने एक प्रकारे नगरपरिषदेची कमकुवत व्यवस्था उघड्यावर पडली. नगरपालिकाच्या गाडीला प्रेशर पाईप पुरेसा नव्हता, तिसऱ्या मजल्या पर्यंतची सिडी नव्हती.कर्मचाऱ्यांचे ड्रेस कोड, हेल्मेट आदी बाबी विरोधात नागरिकांच्या मनात असंतोष होता. त्यांनी आज रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढून व्यवस्थेचा निषेध नोंदवला. यावेळी मयत गौरव जैन यांच्या कुटुंबातील व्यक्तींना यावेळी अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले.
गौरव राखेचा वय २७ याचे आगीत जळून दुःखद निधन झाले .सामान्य माणसाचा मनाला वेदना करणारी व शहारे आणणारी ही दुःखद घटना झाली असून असा प्रकार पुन्हा होऊ नये. त्यासाठी ज्या काही त्रुट्या यावेळेस निदर्शनास आल्या त्या चोपडा नगरपालिका प्रशासनाचे अग्निशामक दल संपूर्णपणे अत्याधुनिक नव्हते .अग्निशामक दलाला जागेवर यायला उशीर झाला त्या नंतर शिरपुर, धरणगाव, अमळनेर ,जळगाव व अन्य शहरातील अग्निशामक दलांनी येऊन आग वीजविण्यास मदत केली. चोपडा अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक साहित्य नसल्यामुळे फायरमन दीपक बडगुजर हे सुद्धा भाजले पण तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते असा प्रकारची आवृत्ती भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून शहरातील जागृत नागरिकांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाने जागृत व्हावे म्हणून मुक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.


सदर मोर्चा कोणाच्या विरोधात नसून प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी सक्षम होणे गरजेचे आहे. नवीन अत्याधुनिक फायर फायटरची गाडी व प्रशिक्षित फायर फायटर्सची आवश्यकता आहे. सदरचा मोर्चा हा सर्व जाती धर्म संपूर्ण नागरिकांचा मूक आक्रोश मोर्चा होता.अशी अघटीत घटना भविष्यात चोपडा शहर व तालुक्यात घडू नये म्हणून प्रशासनाने दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


नगरपालिका प्रशासन अग्निशमन कर २०० ते ४०० रू आकारते. याद्वारे लाखो रुपयांचा कर जमा होतो पण तरीही अग्निशमन दलाची दयनीय अवस्था आहे.
न प चे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा मुख्य अग्निशमन अधिकऱ्यांमार्फत अग्निशमन दलाची तपासणी करण्यात येईल व सुसज्ज यंत्रणा तयार करण्यात येईल असे आश्वासन दिले.


तर म न से चे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांनी न प ची अग्निशमन दल परिपूर्ण होत नाही तो पर्यंत नागरिकांनी टॅक्स भरू नये असे आवाहन केले.
यावेळी अमृतभाई सचदेव, चंद्रहासभाई गुजराथी, अनिलभाऊ वानखेडे , एम व्हि पाटिल , सुकलाल कोळी,जीवन चौधरी ,प्रविणभाई गुजराथी , सुनिल बुरड ,सागर ओतारी ,भुपेन्द्र गुजराथी, आबा देशमुख ,विकास पाटिल, महेश पवार राजु (बिटवा) पाटिल , किशोरभाऊ चौधरी ,डॉ रवींद्र पाटील ,गजेंद्र जयसवाल ,राजेंद्र गंगाधर पाटिल, पंकज पाटिल ,प्रदीप लिंबा पाटिल , नंदू पाटिल ,नंदकिशोर सांगोरे, श्याम भाऊ परदेशी ,संजय श्रावगी, सुनील बरडिया ,पुंडलिक महाजन, राजू देशमुख, राजाराम पाटील , धिरज गुजराथ प्रमोद बोरसे पाटिल, गोपालराव सोनवणे ,दिपक चौधरी , प्रदिप बारी ,नरेंद्र पाटिल ,वंसत पाटिल ,गुलाबचंद देसरडा प्रदीप बरडिया ,राजेंद्र जैन ,दगडूशेठ श्रावगी ,नरेश महाजन ,यशवंत चौधरी आदी उपस्थित होते….

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]