६५ कोटीची पाणीपुरवठा योजना एक वर्षात पूर्ण होईल,२०५० पर्यंत पाण्याचे नियोजन—नगराध्यक्षा मनीषाताई चौधरी


चोपडा:-(प्रतिनिधी)—–चोपडा शहर पाणीपुरवठा करिता पालिका प्रशासन व पदाधिकारी व सर्वसाधारण सभा,सन्माननीय सदस्य करीत असलेले दैनंदिन व्यवस्थापन समस्या उपाययोजना याची प्रत्येक नागरिकास वस्तुस्थिती माहिती व्हावी म्हणून शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी यांनी आपल्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्या या वेळी बोलत होत्या की..
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासनाने २०१८मध्ये गूळ धरणावरून ६५ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून गूळ धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चौदा किलोमीटरची अंतराची पाइपलाइन टाकण्याचे पूर्ण झाले आहे ..नवीन पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे जलदगतीने सुरु आहेत .नगरपालिकेने दोन हजार पन्नासपर्यंत लोकसंख्येवर आधारित दरडोई १३५लिटर प्रमाणे पाण्याचे नियोजन केले आहे तसेच नवीन पाणीपुरवठा योजना दोन हजार वीस अखेर पूर्ण होऊन शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषाताई चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली
चोपडा शहराच्या ६५ हजार लोकसंख्येसाठी १९९० मध्ये तापी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती त्यात पाइपलाइन व कठोरा पंपिंग स्टेशन सह १०•५० दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश होता. शहराची लोकसंख्या ६५ हजार असून २०५०मध्ये १ लाख ३५हजार पर्यंत पोहोचणार आहे. लोकसंख्येनुसार दरडोई १३५ लिटर पाणी देणे गरजेचे आहे .यासाठी २०१७ मध्ये शासनाकडे नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यास २०१८ मद्ये शासनाची मंजुरी मिळाली योजना लवकरच कार्यान्वित होण्यासाठी जलद गतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन तीन पाणीपुरवठा योजनेला २३मे२०१८ च्या सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले .दरम्यान बबन तडवी यांची बदली होऊन अविनाश गांगोडे नवीन मुख्य अधिकारी म्हणून रुजू झाले .पाणीपुरवठा योजनेच्या शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने वनविभागाची परवानगी मिळाल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळून एप्रिल महिन्यात गूळधरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत चौदा किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येऊन पाणीपुरवठा सुरू करण्यात आला .
गुळ धरणातील पंपिंग स्टेशनला फक्त आठ तास वीज पुरवठा होतो परंतु शहराला पाणी पूर्ण होण्यासाठी किमान वीस तास वीज पुरवठा होणे गरजेचे आहे .अशा कठीण काळात नगरपालिकेने दोन जनरेटर भाडय़ाने घेऊन ऐन कडक उन्हाळ्यात ४५अंश डिग्री तापमानातदेखील तरंगते पंप वाहून शहराला पाणीपुरवठा केला. यंदा पावसाळा चांगला झाल्याने गूढ प्रकल्पात ६५ टक्के पाणी साठा आहे .त्यापैकी पंधरा टक्के पाणी शहरासाठी आरक्षित आहे तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे प्रगतीपथावर असून दोन हजार वीस पर्यंत पूर्ण होतील .अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा मनीषा चौधरी व गटनेते जीवन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे …..
